Headlines

गायक पेप्सी शर्माच्या निधनापूर्वी काय झाले?:शेतात जाऊन ट्यूबवेलवर अंघोळ केली; घरी आईकडून खिचडी बनवून घेतली आणि तोंडातून पाणी आले

हरियाणवी गायक पेप्सी शर्मा यांच्या निधनाप्रकरणी त्यांच्या भावाने अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. भाऊ ऋषिपाल यांचे म्हणणे आहे की, पेप्सीची रविवारी छाती दुखत होती. त्यानंतर त्यांना दोनदा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर औषध देऊन त्यांना घरी पाठवले. दुपारी ते शेतातील ट्यूबवेलवर आंघोळीसाठी गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी शिकंजी प्यायली आणि खिचडी खाल्ली. याच दरम्यान…

Read More

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली

वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक कारची मागणी 15 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल कारचे बुकिंग रद्द करून इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्याला पसंती देत आहे. केवळ…

Read More

पेद्दीमधून हटवले जान्हवी कपूरचे वादग्रस्त सीन:दिग्दर्शकाने मान्य केले- काही सीन दिशाभूल करणारे होते; जान्हवीला बोल्ड दाखवल्याने वाद सुरू झाला

साउथ स्टार राम चरण आणि जान्हवी कपूरचा चित्रपट ‘पेद्दी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, पण चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या विरोधामुळे, चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी पुष्टी केली आहे की चित्रपटातून सर्व वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की…

Read More

Sanjay Raut Challenges Kirit Somaiya on 15.15 Lakh Crore Rajesh Exports Scam

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल पाच कोटी रुपये चोरीला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत, देशातील महत्त्वाच्या संस्था . यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही विरोधी…

Read More

फिचने भारताच्या जीडीपी-वाढीचा अंदाज घटवून 6.4% केला:अमेरिका-इराण युद्धाच्या परिणामामुळे वेग मंदावेल; महागाई वाढून 5.3% पर्यंत पोहोचण्याची शक्यता

अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षासाठी (FY27) भारताच्या जीडीपी (GDP) वाढीचा अंदाज 6.7% वरून घटवून 6.4% केला आहे. फिचचे म्हणणे आहे की अमेरिका-इराण युद्धामुळे सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावेल. 3 प्रमुख कारणांमुळे अर्थव्यवस्था मंदावेल 1. अमेरिका-इराण युद्ध आणि तेल संकटाचा परिणाम फिच रेटिंग्जने आपल्या जून ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवालात म्हटले…

Read More

पंतप्रधानांना 12 वर्षे पूर्ण, पण देशाचे 12 वाजले!:मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली तरी त्यांची उंची गाठू शकत नाहीत- विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे 12 वाजले असून जनता महागाई आणि बेरोजगारीने हैराण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले…

Read More

'कंबरेला स्पर्श करणाऱ्याला अटक झाली नाही तर जीव देईन':हरियाणवी डान्सर म्हणाली- 15 जूनपर्यंत वाट पाहीन; आदर मिळेल, तिथेच परफॉर्मन्स देईन

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये हरियाणवी नृत्यांगनेसोबत स्टेज शोमध्ये झालेल्या कथित गैरवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी हाथरस पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, नृत्यांगनेचे म्हणणे आहे की, ज्या तरुणाने तिच्याशी गैरवर्तन केले होते, त्याला अद्याप अटक झालेली नाही. दिव्य मराठीशी बोलताना नृत्यांगना म्हणाली, “हाथरस पोलिसांनी मला 11 जून रोजी पुन्हा…

Read More

दिल्लीनंतर पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी करणार आंदोलन; 11 जूनला तरुणाई येणार रस्त्यावर

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पुणे हे या मोहिमेचे पुढील केंद्र बनले आहे. नेमके आंदोलन…

Read More

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास:500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात…

Read More

353 कट्टे हळद चोरीचे प्रकरण उघड:सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई

हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील औद्योगिक वसाहती मधील एका गोदामातून ३५३ कट्टे हळद चोरणाऱ्या टोळीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार मुख्य जणांना मंगळवारी अटक केली असून, सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांकडून आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून…

Read More