Headlines

अब्दुल सत्तार-अंबादास दानवे आमनेसामने; गळाभेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना नवे बळ:समृद्धीवर योगायोग की संकेत?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सोमवारी आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर अचानक भेट झाली. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे दोन गट भविष्यात एकत्र यावेत, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय…

Read More

भंडाऱ्यात कोणती ग्रामपंचायत मारणार बाजी?:वाशिमच्या चमूकडून जिल्ह्यात पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन भंडारा जिल्ह्यात सुरू झाले असून अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू 1 जुन रोजी दाखल झाली आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची तपासणी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे…

Read More

पुणे गुन्हेगारीत राज्यात प्रथम, देशात पाचवे:सुप्रिया सुळेंनी गृहखाते व 'लाडकी बहीण' योजनेवरून सरकारला घेरले

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे काँग्रेस भवनात काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर गंभीर आरोप केले. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही भेट दिली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीकांत पाटील रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांची मते…

Read More

Indian-origin CEO of Micron included in Forbes Billionaires list

कॅलिफोर्निया13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन चिप कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय मेहरोत्रा ​​फोर्ब्सच्या चिप कंपन्यांच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. फोर्ब्सनुसार, त्यांची संपत्ती 11,406 कोटी रुपये आहे. ते या यादीत समाविष्ट असलेले एकमेव भारतीय आहेत. यामध्ये एनव्हीडियाचे सीईओ जेन्सन हुआंग अव्वल स्थानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 17.46 लाख कोटी रुपये आहे. कानपूरमध्ये जन्मलेल्या मेहरोत्रा ​​(67)…

Read More

इतिहासातील चुका टाळायला हव्यात:ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन, ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि 'हर घर सावरकर' संस्थेतर्फे व्याखानाचे आयोजन

ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी भारतीय समाजाने इतिहासातून बोध घेऊन भूतकाळातील चुका टाळाव्यात, असे प्रतिपादन केले. ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि ‘हर घर सावरकर’ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. तत्कालीन समाज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्या बाजूने ठामपणे उभा न राहणे ही एक मोठी चूक होती, असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या उभारणीमध्ये शहीद…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून:वाघोलीतून कर्नाटकचा प्रियकर फरार, मुलगी पश्चिम बंगालमधील असल्याचे आले समोर

चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. २६ वर्षीय रिहाना खातून असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, तिचा प्रियकर इम्रान राजेसाब बोदले खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान आणि रिहाना हे विवाह न करता वाघोलीतील शिवलक्ष्मी बिल्डिंगमध्ये…

Read More

पुण्यात मानवतच्या तरुणाची आत्महत्या:लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक, गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देत पैशांसाठी सुरू होता त्रास

पुण्यात एका तरुणाने गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खराडी भागात घडली असून, आरोपींनी पैशांसाठी तरुणाला त्रास दिला होता. करण बाळासाहेब कांबळे (वय २८, मूळ रा. खरबा, मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ…

Read More

पुण्यात 11 लाखांची ब्राऊन शुगर जप्त:वाघोली पोलिसांच्या दोघांना बेड्या, बसस्टॉपवर सापळा रचून पकडले

वाघोली पोलिसांनी ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 38 हजार 900 रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिव कालू सिंह (वय 33, रा. बालाजीनगर, वाघोली, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि मांगीलाल (रा….

Read More

गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या…

Read More

भारतीय शेअर बाजाराला दक्षिण कोरियाने मागे टाकले:AI मुळे वेगाने बाजार भांडवल ₹475 लाख कोटी झाले, भारताचे मूल्य ₹456 लाख कोटी

दक्षिण कोरियाचा शेअर बाजार भारताला मागे टाकून जगातील सहावा सर्वात मोठा बाजार बनला आहे. याचे मोठे कारण चिप बनवणाऱ्या दिग्गज कंपन्या आहेत, ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या वापरामुळे सतत विक्रम करत आहेत. ब्लूमबर्गनुसार, या वर्षी दक्षिण कोरियातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) 86% नी वाढून 5 ट्रिलियन डॉलर (सुमारे 475 लाख कोटी…

Read More