'जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम':मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनाची रणनीती ठरली
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत तज्ज्ञ आणि अभ्यासकांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीत सरकारसमोर यापूर्वी मांडण्यात आलेल्या मागण्या, त्याबाबतची कायदेशीर बाजू आणि सरकारने दिलेल्या एसओपी संदर्भात सविस्तर…