Headlines

नागपुरात नितीन गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:बॅरिकेडिंगवर चढत घोषणाबाजी, अनेक कार्यकर्ते ताब्यात

केंद्र सरकारच्या ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला व…

Read More

लोकांचा जीव जातोय, ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे?:गडकरींनी अमेरिकेसारखे सोडा, किमान श्रीलंकेसारखे रस्ते करून दाखवावे- अविनाथ जाधव

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे जर लोकांचा मृत्यू होत असेल तर ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. काल एका महिलेचा आणि आज TDRF पथकातील जवानाचा या खड्ड्यांमुळे जीव गेला आणि तरीही पालकमंत्री, बांधकाम मंत्री आणि सरकारला जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला असेही जाधव यांनी म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Central Govt Statement in Supreme Court on Paper Leak Protest Students

नवी दिल्ली23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई न करण्याच्या आपल्या वचनावर अजूनही गंभीर आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “आंदोलकांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरबाबत काही गैरसमज होता. मला हे सांगण्याचे निर्देश आहेत की, सरकार विद्यार्थ्यांवरील आपल्या वचनाबाबत गंभीर आहे.” कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने गेल्या…

Read More

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा:तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; आरोपी फरार

देशभरात राम मंदिरातील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच, आता महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या घटनेमुळे धार्मिक संस्था आणि देवस्थानांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला असून, भक्तांच्या श्रद्धेशी खेळ खेळला गेल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 60 कोटींहून…

Read More

'रितेशची नोकरी धोक्यात':होस्टिंगवर सलमानची मस्करी, सोहेलच्या माजी पत्नीवर म्हणाला- महान भावाने आरोप स्वतःवर घेतले

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतेच पहिल्यांदाच रिॲलिटी शो होस्ट करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखची खिल्ली उडवली आहे. लहान भाऊ सोहेलला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सलमानने त्याच्या (सोहेलच्या) माजी पत्नीवरही टोमणा मारला आहे. त्याचे म्हणणे आहे की सोहेलने घटस्फोटाचा आरोप स्वतःवर घेतला, पण त्याने (सलमानने) सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. सोहेल खान ॲमेझॉन प्राईमच्या रिॲलिटी शो ‘अलायन्स’चा भाग बनला…

Read More

न्यायव्यवस्थेवरील विश्वास उरलेला नाही:अरविंद सावंतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- भ्रष्टाचार आणि विध्वंस हेच सरकारचे मॉडेल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, न्यायव्यवस्था, धर्मस्वातंत्र्य कायदा, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि संसदेच्या कामकाजासह विविध विषयांवर जोरदार टीका केली. देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी सरकारला जबाबदार धरत कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही…

Read More

मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त वडिलांनी हत्या केली:मृतदेहाजवळ बसून राहिला; ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

आग्रामध्ये प्रेमविवाहामुळे संतापलेल्या एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो मुलीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीने सुमारे 4 महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध गावातीलच एका तरुणाशी कोर्ट मॅरेज केले होते. तो तरुण ITBP मध्ये जवान आहे. मुलीच्या प्रेमविवाहामुळे वडील नाराज होते. लग्नानंतरही मुलगी तिच्या माहेरीच राहत होती. ही घटना रविवारी रात्री उशिरा…

Read More

'AI वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका':तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला, म्हणाले- सोशल मीडियावर दिसते म्हणून प्रत्येक रील खरे नसते

‘एआय’ (AI) मुळात वाईट नसून, आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो यावरच यशाचे गमक ठरते, असे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची मोठी भेसळ केली जात असून एक प्रकारे विचारांचे युद्धच सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाचा भाग न…

Read More

हिंगोली शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला:12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. 3 पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून 12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टिप्पर चालका विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातून वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू उपसा व…

Read More

कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार आज:शिवकुमार सरकारमध्ये 20 मंत्री सामील होतील, 12 नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदा संधी मिळेल

कर्नाटकात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी होणार आहे. काँग्रेस हायकमांडने 20 मंत्र्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 12 नवीन चेहरे पहिल्यांदाच मंत्री बनतील, तर 8 विद्यमान मंत्र्यांची नावेही यादीत आहेत. गायत्री शांतिगौडा या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या एकमेव महिला मंत्री असतील. शपथविधी सोहळा सोमवारी संध्याकाळी 4:05 वाजता बेंगळुरू येथील लोक भवनात…

Read More