सरदार सरोवर प्रकल्पाचे निष्पक्ष पुनर्मूल्यांकन करावे:'जन आयोगा'चा अहवाल जाहीर, पुनर्वसन अपूर्ण अन् पर्यावरणाचे मोठे नुकसान
सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्पाचे निष्पक्ष पुनर्मूल्यांकन आणि आर्थिक पुनर्परीक्षण केले जावे, अशी शिफारस एका स्वतंत्र ‘जन आयोगा’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात केली आहे. प्रकल्पाचे पुनर्वसन अपूर्ण असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जलबिरादरी (महाराष्ट्र), डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट (ओडिशा) आणि हिमधारा (हिमाचल प्रदेश) या तीन सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने या जन आयोगाचे…