साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन
समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. कशाचीही करा. त्याला वैराग्याच्या झालरची आवश्यकता असते. तरच त्या साधनेचे आपण अधिपती होऊ शकू. संप्रदायातील सर्वात मोठी तपश्चर्या वैराग्य आहे. म्हणून संतांसाठी वैराग्य हे भाग्याचे परिचायक आहे. ते संतसंगतीमुळे…