मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नांदगाव पेठ प्रथम:ग्रामविकास, डिजिटल प्रशासन, लोकाभिमुख उपक्रम ठरले यशाचे केंद्रबिंदू
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदगाव पेठ ग्रामपंचायतीने अमरावती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख उपक्रम यावर भर देत ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले. गावातील विविध विकासकामे, स्वच्छ व सुंदर परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत प्रशासन,…