Headlines

पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले‎:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले‎

अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे ‎खड्ड्यात पडल्याचा अंदाज‎ खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यात‎पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.‎लातूर शहरातील बोधेनगर परिसरात‎ रविवारी दुपारी ही घटना घडली.‎ मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर‎येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील‎भागात ही घटना घडली. दिव्या नवनाथ‎उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे‎(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.‎दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते.‎ अशी उघड झाली…

Read More

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, हरित इमारत तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या इमारतीमध्ये प्रत्येक आमदाराला तब्बल १ हजार चौरस फुटांचे आधुनिक घर मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निवासाचे…

Read More

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात घोषणा:नियमात बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्रे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या समारोप समारंभानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीबाबत कॅबिनेट उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आम्ही प्रशासनाकडून काही अतिरिक्त आणि सविस्तर माहिती मागवली आहे. ती माहिती हाती येताच…

Read More

संभाजीनगरात ४०० आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा

‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता मोहीम आता एक आदर्श लोकचळवळ बनली आहे. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी उद्योजक सुनील किर्दक, विंग कमांडर टी. आर. जाधव आणि मानसिंग पवार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ उभी राहिली. मराठा समाज प्रतिष्ठानच्या वसतिगृहातील अवघ्या १५० ग्रामीण…

Read More

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…

Read More

नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी:पाण्यावर चर्चा करता, मग आमचे प्रश्न कधी सोडवणार? गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा सवाल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंवाद परिषदे’त नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच, प्रकल्पग्रस्तांनी अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. अखेर सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळावरून…

Read More

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे:शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे आवाहन

अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. खोलापूर येथील शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कदम यांनी नुकतीच खोलापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटलांची कार्यशाळा…

Read More

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More

वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात 'कृती समिती' आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध

तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने तीव्र आंदोलन केले. ‘महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती’च्या वतीने तिवसा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवण्यात आला. महावितरण प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळी ते मार्च अखेरपर्यंतची वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास बोनस देण्याचे…

Read More

ट्रोलिंगवर आलियाच्या समर्थनात समोर आली आई सोनी राजदान:म्हटले- सोशल मीडियावर खूप द्वेष; कान्समध्ये आलियाला दुर्लक्षित केल्याचा दावा

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 च्या रेड कार्पेटवरून अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. या ट्रोलिंगवर आता आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खरं तर, लेखिका शुनाली खुल्लर श्रॉफ यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करून आलियाला पाठिंबा दिला होता. शुनालीने ट्रोल…

Read More