5 वर्षांत 6 लाखांहून अधिक झाडांची अवैध कत्तल:34 कोटींहून अधिक रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान, राज्याची हरित संपदा धोक्यात
महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड झाली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 6 लाखांहून अधिक झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मौल्यवान सागवान वृक्षांचा समावेश असून, यामुळे राज्याच्या वनसंपदेचे 34 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) कार्यालयाकडून माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही आकडेवारी समोर आली…