टोलनाक्यावर वाद सोडवण्यास आलेल्यापोलिस कर्मचाऱ्यास तरुणांकडून मारहाण:माळीवाडी टोलनाक्यावरील घटना, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू
टोलनाक्यावर वाद झाल्याची माहिती ११२ या क्रमांकावर मिळाली होती. त्या ठिकाणी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना अंबड तालुक्यातील माळीवाडी टोलनाक्यावर २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आसिफ कय्युम शेख (पाचोड) याच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा दाखल आहे. अंमलदार पवन बळीराम चव्हाण (३२) यांनी अंबड ठाण्यात तक्रार दिली आहे. टोलनाका परिसरात ५० ते…