Headlines

9 हजार 605 कोटींचा हिशोब कोण देणार?:हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला…

Read More

Durg IGKV Paper Leak Case

रायपूर58 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका प्राध्यापकाने एंडोस्कोपी कॅमेऱ्याने स्कॅन करून पेपर लीक केला. पेपर सीलबंद लिफाफ्यात ठेवला होता. प्राध्यापकाने त्यात सुईने भोक पाडले, नंतर एंडोस्कोपी कॅमेरा लिफाफ्यातील लहान भोकातून आत टाकून पेपर स्कॅन केला. यानंतर, ती माहिती हाताने लिहून विद्यार्थ्यांना 11-11 हजार रुपयांना विकली. पोलिसांनी प्राध्यापकासह 6 आरोपींना अटक केली आहे. दोन…

Read More

बोरगाव निस्ताने येथील शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी आणि कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल

धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथे एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. संजय भोपतराव भलावी (वय ५२) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शनिवारी दुपारी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून जीवन संपवले. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, वाढते कर्ज आणि कर्जमाफीच्या अनिश्चिततेमुळे ते हताश झाले होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत…

Read More

27 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:वाढदिवसाच्या दिवशीच संपवले जीवन

तिवसा येथील गुरुदेव नगरमधील मंजुळा माता नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय शुभम अरुण राऊत या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. दिंडेकर लेआऊट परिसरातील एका पडक्या विहिरीत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि जिल्हा शोध व नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी…

Read More

ओडिशाजवळ चिनी खलाशी असलेले जहाज बुडाले:24 जण होते; भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने बचावकार्य सुरू केले

ओडिशाच्या पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० सागरी मैल दूर बंगालच्या उपसागरात आज एक मालवाहू जहाज बुडाले. पनामाचा ध्वज असलेल्या या जहाजावर २४ खलाशी (क्रू सदस्य) होते. पीटीआयनुसार, यापैकी बहुतेक चिनी नागरिक होते. हे जहाज ओडिशातून लोहखनिज घेऊन सिंगापूरला जात होते. हे शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यावरून निघाले होते. जहाज बुडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इंडियन कोस्ट गार्ड…

Read More

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी तरुणावर सुपर स्पेशालिटीत मोफत शस्त्रक्रिया:कवटीच्या फ्रॅक्चरची दुरुस्ती करून टाळूचा जिवंत भाग जतन केला

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) धारणी येथील २८ वर्षीय तरुणावर अस्वलाच्या हल्ल्यात झालेल्या गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य पार पडली. अस्वलाच्या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या टाळूच्या मोठ्या भागावर इजा झाली होती, तसेच कवटीच्या पुढील व…

Read More

साखरेचे दर आठवडाभरात 20 रुपयांनी वाढले:राजू शेट्टींचा 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, चौकशीची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीमागे २० हजार कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. देशात पुरेसा साठा असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून अवघ्या आठवडाभरात साखरेचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी वाढवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

अमरावतीत आणखी एका तलाठ्याचे निलंबन:अहिल्याबाई होळकर योजनेबाबत दिशाभूल केल्याचा आरोप, इतर दोघांवरही कारवाईची शक्यता

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आणखी एका तलाठ्याचे निलंबन केले आहे. दर्यापूर तालुक्यातील पेठ इतबारपूर येथील विश्वनाथ गोंडाणे असे निलंबित तलाठ्याचे नाव आहे. राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत आक्षेपार्ह माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जिल्हाधिकारी येरेकर यांनी शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचा आदेश बजावला. गेल्या दोन दिवसांतील तलाठ्याच्या निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. गोंडाणे…

Read More

थरूर म्हणाले- काँग्रेसने CJP कडून शिकण्याची गरज:जात-वर्ग सोडून वर यावे; सामान्य भारतीय आणि मध्यमवर्गाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे

तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेस पक्षाने कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून शिकले पाहिजे. काँग्रेसने जात आणि वर्गाच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. थरूर यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा काँग्रेस ओबीसींपर्यंत पोहोच आणि जातीवर आधारित प्रतिनिधित्वावर लक्ष केंद्रित करत आहे. थरूर म्हणाले की,…

Read More

आरोग्यमंत्री अन्यायकारक निर्णय रद्द करण्यास राजी:हिवताप समन्वय समितीच्या मागणीनंतर सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र राज्य हिवताप विभाग अन्याय विरोधी संघर्ष समन्वय समितीने आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या विभागामार्फत १६ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेला अन्यायकारक निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील मंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्यास सहमती दर्शविल्याचा समितीचा दावा आहे. समितीचे निमंत्रक दामोधर पवार यांनी…

Read More