सध्याचे लोकप्रतिनिधी जनतेचे शत्रू:माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप, प्रशासनावरही ताशेरे ओढले
अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी माध्यमांसमोर शहरातील विविध प्रलंबित योजना आणि सध्याच्या समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. ज्या लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडवायला हव्यात, ते सरकारकडून ठोस कृती करून घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे तेच जनतेचे शत्रू (एनिमी ऑफ द पीपल) असल्याचा गंभीर ठपका त्यांनी…