सुपा MIDC मधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश, तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून दूषित सांडपाणी सोडून परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत प्रदूषित केले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून समोर आल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या स्पष्ट…