Headlines

मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक!:29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषण, थेट मुंबईला धडक देण्याचाही दिला इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथेच पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. या उपोषणाच्या ठिकाणावरून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना, त्यांनी स्पष्ट केले की हे उपोषण अंतरवाली सराटीतच होईल. मात्र, याचबरोबर त्यांनी एक गंभीर इशाराही दिला आहे की, उपोषणादरम्यान जर आरक्षणाचा…

Read More

अमरावतीत सरासरीपेक्षा 66.2 टक्के कमी पाऊस:15 दिवसांपासून दडी, 202.30 मिमी.ची तूट; शेतकरी चिंतेत

अमरावती जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अवर्षणाचे सावट गडद झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५९८ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ ३९५.७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे २०२.३० मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली असून, ही सरासरीच्या ६६.२ टक्के आहे. पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांची वाढ खुंटली…

Read More

वंदे मातरमचे फक्त दोनच कडवे गाणार काँग्रेस:CWC बैठकीत निर्णय, म्हटले- वंदे मातरम् व राष्ट्रगीत भाजपसाठी राजकीय मुद्दे

नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे बुधवारी काँग्रेस कार्यसमितीची (CWC) बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भूषवले. या बैठकीत माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह 88 नेते सहभागी झाले. काँग्रेसने वंदे मातरम्बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्ष 1937 मध्ये…

Read More

'माझे तारुण्य किंवा बेडरूमबद्दल स्वप्ने पाहू नका':बाबा रामदेव यांच्या विधानावर कंगना भडकली, म्हणाली- माझे चारित्र्य तुमच्यापेक्षा चांगले

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने योगगुरु बाबा रामदेव यांच्या टिप्पणीवर संताप व्यक्त करत म्हटले की, बाबा जी, माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्ने पाहू नका. खरं तर, कंगनाने बाबा रामदेव यांच्या त्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ (Generation Gutter) या विधानावर म्हटले होते की, ही बिघडलेल्या मेंदूची (विचारांची) निशाणी आहे. कंगनाने इन्स्टाग्राम…

Read More

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. पवार यांच्या हस्ते बुधवारी (१९ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अभियंता…

Read More

Ladki Bahin Yojana e-KYC Verification List; 92 Lakh Beneficiaries Ineligible

महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एका मोठ्या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी विचारलेल्या माहितीमधून असे समोर आले आहे की, राज्य सरकारन . पडताळणीपूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्या सक्रिय महिलांची संख्या 2.48 कोटींच्या घरात होती, मात्र छाननीनंतर ती आता 1.65 कोटींवर येऊन स्थिरावली…

Read More

मोदी सरकार रोज एका विद्यापीठात एक केंद्रीय मंत्री पाठवेल:दावा- विद्यार्थ्यांशी संवाद आणि योजनांची माहिती देतील; जेन-झीच्या आंदोलनानंतर निर्णय

मोदी सरकार युवकांशी जोडले जाण्यासाठी दररोज एका विद्यापीठात एक केंद्रीय मंत्री पाठवण्याची योजना आखत आहे. मंत्री विद्यार्थ्यांशी त्यांच्या चिंतांवर बोलतील आणि देशाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांचे दृष्टिकोन समजून घेतील. ‘वन डे, वन युनिव्हर्सिटी’ कार्यक्रमांतर्गत मंत्री निश्चित केलेल्या विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ते विद्यार्थ्यांची मते ऐकतील आणि विशेषतः युवक व विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या सरकारी…

Read More

धीरजच्या अवयवदानाने अनेकांना जीवनदान:अपघातात निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा धाडसी निर्णय

चांदूर रेल्वे येथील धीरज संतोष कालावटे या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय अनेकांसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या धीरजचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे काही अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अमरावतीच्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या समाजाभिमुख निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुमारे…

Read More

समाजातील वैचारिक अपंगत्व दूर करा:भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात भय्याजी जोशींचे प्रतिपादन

समाजातील वैचारिक अपंगत्व दूर करावे लागेल तर प्रत्येक नागरिक मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने योगदान देईल, ज्यामुळे आपला देश स्वावलंबी आणि शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या देणगीदार आणि हितचिंतक संमेलनात ते बोलत होते. यावेळी…

Read More

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026 जाहीर:श्रीधर लोणी, अंजली खमितकर, मयुरेश प्रभुणे, मोनेश शेलार यांचा 22 ऑगस्टला सन्मान

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारे ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026’ जाहीर झाले आहेत. यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ‘सकाळ’चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता…

Read More