Headlines

विद्यार्थी सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’:66 स्कूल बसची तपासणी, 33 वर कारवाई, ओव्हरलोडिंग, फिटनेस, अग्निशामक, प्रथमोपचार पेटीसह सुरक्षा साधनांची तपासणी‎

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बससह अन्य वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ६६ व . अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक…

Read More

अध्यात्मामुळे मानवी जीवनातील नकारात्मक विचार होतात दूर:पारायण सोहळ्याची भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता‎

धार्मिक कार्यातून मनाला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथेच परमेश्‍वराचे अस्तित्व अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने माणूस आपल्या गावापासून दूर जातो. मात्र नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरूप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्मामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असे…

Read More

सहा किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत अपहरणकर्त्यांना समृद्धी महामार्गावर पकडले!:पुण्याहून तरुणाला उत्तर‎प्रदेशात नेत असताना‎पोलिसांची कारवाई‎

पुण्यातून तरुणाचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेशात घेऊन जाणाऱ्या संशयितांच्या कारचा समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी तब्बल तीन किलोमीटर थरारक पाठलाग करत कार अडवली. ही घटना बुधवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न उधळून लावत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील चिखली परिसरातून आरशद…

Read More

यूपीच्या 23 जिल्ह्यांत पूर:बिहारमध्ये 5 लाख जण प्रभावित; एमपीत मंदाकिनी-नर्मदेला पूर,, हिमाचलमध्ये 266 मृत्यू

उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे 23 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसी आणि चित्रकूट सर्वाधिक प्रभावित आहेत. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे. वाराणसीत आतापर्यंत 407 कुटुंबांनी घरे सोडली आहेत. काशीतील सर्व 84 घाट पाण्याखाली गेले आहेत. बिहारच्या 16 जिल्ह्यांतील सुमारे 5 लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. गंगेसह 8…

Read More

विद्यार्थिनीची राहुल गांधींना विनंती- मला न्याय मिळवून द्या:बाबांवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा वाचवले जात आहे; गांधी म्हणाले- मी तुमच्यासोबत

कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनावेळी जंतर-मंतरवर निशू आझाद यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण आता राहुल गांधींपर्यंत पोहोचले आहे. निशूने गुरुवारी हल्ल्यातील आरोपी स्वतंत्र भारद्वाज यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे मदत मागितली होती. निशूने संध्याकाळी 4.30 वाजता आरोप केला की, दिल्ली पोलीस तिच्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत नाहीत. निशूच्या विनंतीनंतर 3 तासांनी राहुल…

Read More

पीककर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची अट रद्द करा:गुणवंत होळकर यांची राहुल गांधींकडे मागणी‎

शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळताना सिबिल स्कोअरची अट लावली जात असल्याने अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र/राज्य योजना सनियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत अशोक होळकर यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी…

Read More

लासलगाव आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल:आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवास होणार आरामदायी‎

लासलगाव व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले. लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व कृषी केंद्र असून परिसरातील…

Read More

शिवराईतील शिक्षण परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर मंथन:ए.आय. प्रशिक्षणासाठी पूर्वतयारीच्या सक्त सूचना‎

हतनूर कन्नड तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवराई (केंद्र हतनूर) येथे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिताराम आहेर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संतोष करवंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर देशपांडे यांनी शिवराई शाळेचा शैक्षणिक आढावा मांडला. परिषदेत शिक्षकांसाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. अतुल…

Read More

कॅमेऱ्यासमोर दिसले खाकीचे ‘यशचित्र’ पडद्यामागील चुकांवर अधीक्षकांची नजर:दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई, आता जबाबदारीची साखळी कुठवर?‎

समोर पाच आरोपी… मागे वैजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा… बाजूला जप्त वाहन. २ सप्टेंबरचे हे ‘यशचित्र’ पाहिले तर सात दिवसांच्या कारवाईची सांगता झाल्यासारखी वाटते; पण हीच फ्रेम २६ ऑगस्टपर्यंत मागे नेली की श्रेयाच्या गर्दीत काही गंभीर चु . गुन्हा वैजापूर की वीरगावमध्ये नोंदवायचा, याचा निर्णय पुढे झाला असता. दरोडेखोर मात्र क्षेत्राधिकार ठरेपर्यंत रस्त्यावर…

Read More

फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा:उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्रींचे आवाहन‎

आगामी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात, शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी दक्ष राहावे. उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे व गुलालाचा वापर टाळून पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि फुलांची उधळण करत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी केले. कन्नड येथील तहसील कार्यालयात गुरुवारी आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी व नियोजन बैठकीत त्या बोलत…

Read More