Headlines

पतीच्या पार्थिवाजवळ पत्नी दोन दिवस बेशुद्धावस्थेत पडून:जनगणना कर्मचाऱ्यांमुळे मिळाली तत्काळ वैद्यकीय मदत‎




जनगणनेच्या कामासाठी गेलेल्या‎कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध‎महिलेला वेळीच वैद्यकिय मदत मिळू शकली.‎ही घटना शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील ‎‎सर्कल क्रमांक ३ येथे उघडकीस आली. ‎‎प्राथमिक वैद्यकिय अंदाजानुसार दोन‎दिवसांपूर्वी वृद्ध पतीचा मृत्यू झाला व त्या ‎‎धक्क्यामुळे पत्नी त्यांच्याच पार्थिवाजवळ‎बेशुद्ध अवस्थेत पडून होती. योग्य वेळी मदत ‎‎मिळाल्याने तिचा जीव वाचला.‎ जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक‎क्रमांक १५ च्या प्रगणक वैशाली नालसे या ‎‎संबंधित घरात माहिती संकलनासाठी‎पोहोचल्या. त्यांच्यासोबत ब्लॉक क्रमांक १६‎चे प्रगणक मनोज वाकोडे तसेच सुपरवायझर ‎‎केशव पंचारिया हेही उपस्थित होते. या घराचा ‎‎दरवाजा अनेकदा ठोठावून आवाज‎दिल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद‎मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांकडे ‎‎चौकशी केली. त्या घरात वृद्ध दाम्पत्य एकटेच ‎‎राहत असल्याचे, तसेच आजोबांची प्रकृती ‎‎नेहमीच खालावलेली असल्याचे सांगण्यात ‎‎आले. मात्र त्या घरातील आजी दररोज‎सकाळी फिरायला जात असल्याची माहिती ‎‎शेजाऱ्यांनी दिली. सुरुवातीला दोघे बाहेर गेले ‎‎असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात‎आला. मात्र, घरातील लाईट आणि पंखे सुरू ‎‎असल्याचे प्रगणकांच्या लक्षात आले. त्यामुळे‎संशय अधिक बळावला. त्यांनी खिडकीतून‎घरात डोकावून पाहिले असता समोरचे दृश्य‎अंगावर काटा आणणारे होते. वृद्ध आजोबा‎जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेले होते,‎तर त्यांच्या शेजारी वृद्ध पत्नी बेशुद्ध अवस्थेत‎पडून होत्या. घरातून दुर्गंधीही येत होती.‎ यावेळी क्षणाचाही विलंब न करता‎जनगणना कर्मचाऱ्यांनी शेजाऱ्यांना‎मदतीसाठी बोलावले. जवळ राहणाऱ्या‎डॉक्टरांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली‎असता वृद्ध आजोबांचा सुमारे दोन‎दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‎पतीची अवस्था पाहून पत्नीला धक्का बसला‎आणि त्या बेशुद्ध पडल्याची शक्यता व्यक्त‎करण्यात आली. त्यानंतर संबंधित वृद्ध‎महिलेला तातडीने एका खासगी‎हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.‎डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरातील‎पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली होती‎तसेच ऑक्सिजन लेव्हलही धोकादायकरीत्या घसरली होती. आणखी‎काही तास उशीर झाला असता तर त्यांच्याही‎जीवला धोका होवू शकला असता, असे डॉक्टरांनी‎सांगितले. दरम्यान जनगणना कर्मचाऱ्यांनी‎दाखविलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि‎माणुसकीमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले. या‎घटनेनंतर परिसरातून जनगणना कर्मचाऱ्यांवर‎कौतुकाचा वर्षाव होत आहे.‎ दाम्पत्याचा एक मुलगा परदेशात,‎तर दुसरा नागपुरात राहायला‎ या दाम्पत्याला दोन मुल आहेत. त्यापैकी एक‎मुलगा परदेशात वास्तव्यास असून दुसरा‎नागपुरात राहतो. घटनेची माहिती दोन्ही‎मुलांना देण्यात आली. मृत वृद्धावर‎अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहीती‎मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *