![]()
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न
.
पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते.
सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात ^ यंदाचा उन्हाळा फारच कठीण गेलाय. हिरवा चारा तर पूर्णपणे बंदच झालाय. मुरघास घ्यायचा म्हटले तर त्याचे दर गगनाला भिडले आहेत. आमच्याकडे ८-१० जनावरे आहेत, त्यांना रोजचा खर्च भागवणेही कठीण झाले आहे. दूध विकून जे उत्पन्न मिळते त्यातून खर्च निघत नाही. शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करून अनुदान द्यावे -सचिन देशमुख, शेतकरी