Headlines

Admin

सोलापूर ग्रामीण पोलिस संघाने पटकावले प्रथम बक्षीस:पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण‎

खेळाडूंनी खिलाडी वृत्ती ठेवून खेळाचा आनंद घ्यावा, आपले खेळातील प्राविण्य दाखवावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर जिल्ह्यातील २९ व पुणे शहरातील बॉम्ब स्क्वॉड विभागाच्या एका संघाने, अशा . सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच…

Read More

रायगडमध्ये पुराचा कहर!:एचपीसीएल प्रकल्पातील हजारो LPG सिलिंडर नदीत वाहून गेले; थरारक व्हिडिओ समोर

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. पुराच्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने हजारो गॅस सिलिंडर नदीत वाहून गेल्याने प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. पाण्याचा वेगवान प्रवाह अन् ३,००० सिलिंडर नदीत गेल्या काही…

Read More

कारभाराचे धिंडवडे:मोहोळ मध्ये झेडपी मुलींच्या शाळेत अस्वच्छता, स्वच्छतागृहाचा अभाव, आहार निकृष्टतेचा ठपका

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या अचानक केलेल्या पाहणीत मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील तपासणी केलेल्या ६ पैकी तब्बल ५ शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. मुलींच्या शाळेत अस्वच्छता, प्रांगणातील साचलेले पाणी आणि विद्यार्थ्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार यावरून समितीने प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले….

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत

अंजनगाव बारी मे महिन्यातील वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटमुळे अंजनगाव बारी परिसरातील केळी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १,८०० केळीची खोडे वादळात…

Read More

मूर्तिजापुरात ‘एसआयआर'चे काम सुरू:नागरिकांनी प्रपत्र भरावे; एसडीएम संदीप कुमार अपार यांचे आवाहन‎

दर २० वर्षांनी राबवल्या जाणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सध्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले गणना प्रपत्र बीएलओ किंवा बीएलए यांच्याकडे भरून देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी पत्रकार परिषदेत केले. तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार महेश नागोलकर उपस्थित…

Read More

वनमहोत्सवानिमित्त महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने 1000 वृक्षांची लागवड करणार:ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग‎

पावसाच्या सुरुवातीचा कालावधी वृक्षारोपणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने १ ते ७ जुलै या कालावधीत “वन महोत्सव’ अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. . उपक्रमाचे नियोजन व कार्यान्वयन एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वृक्षारोपण मोहिमेत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,…

Read More

फिजिओथेरपिस्टची ड्राय नीडलिंग कार्यशाळा:बंगळुरूचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. शुभंजन दास यांच्यासहविविध तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन‎

अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टच्या वतीने शहरात तीन दिवसीय ड्राय नीडलिंग कार्यशाळा संपन्न झाली. भौतिकोपचार विश्वातील ही आधुनिक पद्धतीचे सर्व फिजिओथेरपिस्ट वर्गाला आकलन व्हावे यासाठी हा उपक्रम साकार करण्यात आला. रायझिंग सन सभागृहात संपन्न यात आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त “प्रमाणपत्र कोर्स ड्राय नीडलिंगच्या संदर्भात’ आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने फिजिओथेरपिस्ट सहभागी झाले. कार्यशाळेत…

Read More

‘सीए’च्या उपप्रादेशिक परिषदेमध्ये नितीन गडकरींचे व्हीसीद्वारे मार्गदर्शन:आयसीएआयच्या वतीने आयोजन; महाराष्ट्रातून लेखापाल उपस्थित‎

शहरातील आयसीएआय शाखेच्या वतीने शेगाव येथे सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटंट्स) यांची दोन दिवसीय ‘ज्ञान उदय’ उप-प्रादेशिक परिषद घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची परिषद वर्षातून केवळ एकदाच घेतली जाते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आसीएआय) वतीने आयोजित या परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे…

Read More

सोयाबीन न उगवल्याच्या 197 तक्रारी:पावसाच्या आगमनामुळे खरिपाची 57% पेरणी पूर्ण; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांसमाेर आर्थिक संकट‎

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला असून आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. तरीही, पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने (जर्मिनेशन प्रॉब्लेम) शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण १९७ तक्रारी आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच १,१८,७६५.७ हेक्टरवर पेरणी…

Read More

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 225 विशेष बस:भाविकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था; 45 प्रवाशांचा गट असेल तर गावातूनच बसची सोय‎

. आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने यंदा २२५ विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बस २० ते ३० जुलै या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. यात्रेचा मुख्य दिवस २५ जुलै आहे. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर, वेळेवर प्रवास करता यावा यासाठी ही विशेष…

Read More