Headlines

Admin

इराण कराराच्या आशेने मार्केट उसळले:सेन्सेक्समध्येही 1,073 अंकांची वाढ, तेल स्वस्त, बँकिंग-ऑटोमध्ये खरेदी, जोखीम घटतेय

अमेरिका- इराण यांच्यात शांतता कराराच्या आशांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात नव चैतन्य आले. कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठी घसरण व जागतिक बाजारपेठांमधील मजबुतीच्या जोरावर सेन्सेक्स १,०७३.६१ अंक म्हणजेच १.४२% उसळी घेऊन ७६,४८८.९६ वर बंद झाला. निफ्टी ५० ने ३१२.४ अंकांच्या वाढीसह २४,०३१.७ चा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७६,५५९ पर्यंत पोहोचला होता. दिवसात १,१४४ अंकांची इंट्राडे वेगाने…

Read More

दंगल नियंत्रण सरावात हातात ग्रेनेड फुटून 4 पोलिस जखमी:अहिल्यानगरला बकरी ईदनिमित्त सुरू होता सराव

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सोमवारी (२५ मे) दंगल नियंत्रण व जमाव नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या सरावावेळी प्लास्टिक स्मोक स्टन ग्रेनेड हातातच फुटल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची पोलिस उपअधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले….

Read More

मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला

शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या…

Read More

महायुतीची विधान परिषद ‘रणनीती’:नाशिक, संभाजीनगरसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा; भाजप 2020 च्या तुलनेत मित्रपक्षांच्या 3 जागा खेचण्याच्या प्रयत्नात

१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची . माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला…

Read More

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास, पुणे महोत्सवात मत

ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले. रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल…

Read More

आरटीई प्रवेशासाठी २९ मे अंतिम तारीख:प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. शिक्षण विभागाने ही अंतिम तारीख निश्चित केली असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या मुदतीत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील २२७ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत एकूण २ हजार ५८६…

Read More

पेसा शिक्षकांची जि.प.वर धडक, कायम नियुक्तीची मागणी:आमदार तायडे यांचा मुद्दा, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा

अमरावती: मेळघाटात ‘पेसा’ अंतर्गत सेवा दिलेल्या शिक्षकांना आगामी सत्रासाठी रुजू करून न घेता, त्या जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जात आहे. याविरोधात जुन्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, त्यांनाच पुनर्नियुक्ती मिळावी या मागणीसाठी २५ मे रोजी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सेवा दिली आहे. त्यांना…

Read More

प्रत्येक दुकानदाराने समाजासाठी एक CCTV कॅमेरा लावावा:ठाणेदार सागर भामरे यांचे शांतता समिती बैठकीत आवाहन

चांदूर बाजार येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सागर भामरे यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानासमोर समाजहितासाठी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन केले आहे. नगरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये…

Read More

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 70 लाखांची फसवणूक उघड:पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये दोघांना केली अटक

पुणे पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशी कॉल सेंटरसाठी प्रकल्प आणि सेटअप उभारून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने तब्बल ७० लाख ८५ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अधिक मासानिमित्त 'श्री दत्त दिंडी'चा गजर:तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिकमासात भक्तीमय वातावरण

शेंदुरजनाघाट शहरात तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिक मासानिमित्त ‘श्री दत्त दिंडी’चा गजर सुरू झाला आहे. १७ मे रोजी सुरू झालेली ही दिंडी १५ जूनपर्यंत महिनाभर चालणार असून, पहाटेच्या भक्तीमय वातावरणाने संपूर्ण नगरी दुमदुमून गेली आहे. हिंदू पंचांगानुसार, दर तीन वर्षांनी ज्येष्ठ अधिकमास येतो, ज्यामुळे यावर्षी हिंदू नववर्ष १३ महिन्यांचे झाले आहे. या काळात लग्नकार्यासारखी सर्व…

Read More