Headlines

Admin

घाटनांद्र्याचा सुपुत्र भारतीय सैन्यात:नितीन कापसेचा जल्लोषात सत्कार

प्रतिनिधी | घाटनांद्रा गावचा सुपुत्र नितीन दगडूबा कापसे याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क या पदासाठी निवड झाली आहे. त्याच्या निवडिमुळे गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आह. त्याच्या या यशाबद्दल शुक्रवारी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होत नितीन कापसेचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. नितीन कापसे, वडील…

Read More

रावेर, यावल तालुक्यांत वादळासह पाऊस:जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल तालुक्यातील काही गावांत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किरकोळ वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसानंतर वातावरणात बदल झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून असह्य उन्हाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना काहीअंंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी पाऊस…

Read More

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेगवान टप्पा:समुद्राच्या खालून बोगद्यासाठी दुसऱ्या महाकाय ‘टीबीएम’चे आगमन; जुलै 2026 पासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी आता गती मिळाली आहे. विक्रोळीनंतर आता सावली (घनसोली) येथे दुसऱ्या महाकाय टनेल बोअरिंग मशीनचा (टीबीएम) “कटरहेड’ यशस्वीरीत्या खाली उतरवण्यात आला आहे. १३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड म्हणजे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने एक नवा चमत्कार मानला जात असून यासह आता बुलेट ट्रेनच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले…

Read More

कोठारे गावामध्ये पोहोचवले 10,000 लिटर पाणी:शहापुरात ‘जलदान मोहिमे’मुळे तीनशे कुटुंबांची पाण्यासाठीची पायपीट थांबली

जेव्हा कडक उन्हात घसा कोरडा पडतो आणि पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तेव्हा पाण्याचा एक हंडाही अमृतासारखा वाटतो. असाच काहीसा ‘अमृताचा अनुभव’ शहापूर तालुक्यातील कोठारे येथील ३०० आदिवासी कुटुंबांनी घेतला. विविध सामाजिक संस्था आणि संवेदनशील सुजाण नागरिकांनी एकत्र येत राबवलेली “आयडेंटिटी वॉटर फॉर लाइफ – जलदान मोहीम २०२६” ही केवळ पाणी वाटपाची मोहीम ठरली नाही, तर…

Read More

Petrol Rs 2.61, Diesel Rs 2.71 Costlier Amid Iran War Impact

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल ₹2.61 प्रति लिटर आणि डिझेल ₹2.71 प्रति लिटरने महाग केले आहे. या वाढीनंतर दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत ₹102.12 आणि डिझेलची किंमत ₹95.20 झाली आहे. या महिन्यात चौथ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर इंधनाच्या दरात…

Read More

ढिगाऱ्याखाली दबलेली शाळा, धक्क्यातून सावरताहेत मुले:विदूषकांनी परत आणले हास्य, 100% निकालातून वायनाडने दाखवला नवा मार्ग

भूस्खलनात ३२ मुलांचा मृत्यू झाला होता, बाकीचेही आपत्तीग्रस्त होते ३० जुलै २०२४ रोजी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मेप्पाडी पंचायतीचे मुंडक्कई, चूरलमला आणि वेल्लारमला गावे ढिगाऱ्याखाली दबली गेली. २९८ लोक मारले गेले होते. वेल्लारमला येथील सरकारी हायस्कूल उद्ध्वस्त झाले होते. येथेही ३२ विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. जे वाचले, त्यापैकी काहींनी आई-वडील तर…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

प्रगतिशील शेतकरी:तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग

सतत बदलणारे हवामान, खतांचे वाढते गगनचुंबी दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेती बेभरवशाची ठरत असताना, माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील चव्हाणवाडी येथील एका प्रगतीशील युवकाने आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. येथील तरुण शेतकरी शाम नांगरे यांनी अवघ्या १३ गुंठ्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात ‘अलिबाग’ जातीच्या तोंडलीची यशस्वी लागवड करून, त्यातून वर्षाकाठी तब्बल ५ लाख…

Read More

विधान परिषद निवडणूक: आजपासून उमेदवारी अर्ज दाखल:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी रणधुमाळी सुरू

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आज, सोमवार, २५ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सकाळी ११ ते…

Read More

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी

अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. सूत्रांनुसार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, नागपूरचे उद्योजक हर्षजीत देशमुख यांनी थेट…

Read More