Headlines

Admin

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला भीषण आग:शॉर्टसर्किटमुळे दप्तर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान; सखोल चौकशीची मागणी

नागपूर येथील कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात नगराध्यक्षांचे केबिन, संगणक, फर्निचर आणि महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेल्या या आगीमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे. पहाटे कार्यालयातून धूर निघत असल्याचे रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे यांच्या निदर्शनास…

Read More

गरम रसात पडून 60 टक्के भाजलेला चिमुकला:हृदयाचे ठोके थांबूनही पुण्यातील डॉक्टरांनी दिले नवे आयुष्य

पुण्यात एका तीन वर्षांच्या बालकाला डॉक्टरांनी नवजीवन दिले आहे. घरात खेळताना गरम चिंचेच्या रसात पडून तो ६० टक्के भाजला होता. प्राथमिक उपचारादरम्यान त्याचे हृदयाचे ठोकेही थांबले होते. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ४० दिवसांहून अधिक काळ उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. आता त्याला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. थेरगाव येथील रहिवासी असलेल्या हरीश…

Read More

एल निनोमुळे चारा टंचाईची शक्यता, पशुपालकांनी लक्ष द्यावे:पशुधन व दुग्धोत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक

जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी…

Read More

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे…

Read More

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- मी पुण्यातच, दिल्लीला गेलो नाही; पक्षाकडून व्हीप जारी

शिवसेना ठाकरे गटातील ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहण्याच्या आणाभाका घेणाऱ्या ओमराजेंचे नाव या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेत आल्यामुळे, त्यांचे जुने व्हिडीओ व्हायरल करत त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे….

Read More

तुमचे 'राजे' कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक पक्ष सोडून का जात आहेत याचा कधी विचार केला आहे का, असा सवाल करत तुमचे ‘राजे’ कधी…

Read More

MIT Dropout Aman Sangars Cursor AI Acquired by SpaceX for $60 Billion

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने एआय कोडिंग प्लॅटफॉर्म ‘कर्सर’ची मूळ कंपनी एनिसफियरला 60 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 5.67 लाख कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी एक विलीनीकरण करार केला आहे. या करारानंतर कर्सरचे 25 वर्षीय भारतीय वंशाचे सह-संस्थापक अमन संगर यांची अंदाजित निव्वळ संपत्ती वाढून 5.5 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 51.98 हजार…

Read More

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; चर्चांना आणि अफवांना अखेर पूर्णविराम

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विभागाला टाळे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने वृत्त विभाग बंद होण्याच्या सर्व अफवा आणि चर्चांना कायमचा…

Read More

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये…

Read More

मान्सून कमकुवत, देशाच्या 40% भागात पावसाची कमतरता:एमपी, राजस्थान, गुजरात-कर्नाटकवर ढग नाहीत; 7 दिवसांपासून तेलंगणामध्ये अडकला मान्सून

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा मोठा भाग व्यापलेला नाही. 17 जूनच्या सकाळी घेतलेल्या उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकवर मान्सूनचे ढग नाहीत. या राज्यांमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. हवामान विभागाच्या मते, देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. म्हणजेच, देशाच्या 40% भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचे मुख्य…

Read More