Headlines

Admin

भव्य भीमगीतांनी दुमदुमले नगर शहर; नागरिकांचाही मिळाला प्रतिसाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. गुरुवारी माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार सादरीकरणाने वातावरण…

Read More

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले

दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, “कोण आहे रे तिकडे?” त्यावर त्यातील एकाने म्हटले, “आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.” दूसरा व्यक्ती म्हणाला,…

Read More

'शांतपणे ₹15,000 देत राहा, आनंदी राहा':सर्वोच्च न्यायालयाने पत्नीपासून 16 वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला

सर्वोच्च न्यायालयाने 16 वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहत असलेल्या 54 वर्षीय व्यक्तीला घटस्फोट देण्यास नकार दिला. न्यायालयाने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला ₹15,000 मासिक पोटगी देत राहावे आणि जर घटस्फोट हवा असेल तर कायमस्वरूपी पोटगीचा ठोस प्रस्ताव द्यावा. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, आजच्या काळात ₹15,000 ही खूप कमी…

Read More

बहुमत असूनही 'प्रशासकीय' हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली:पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत…

Read More

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी रुजू:जनहितार्थ प्रकल्पांना गती देण्यावर भर देणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी (१० मे) पदभार स्वीकारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता,…

Read More

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी अनेक भागांत दुरुस्ती

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना…

Read More

आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत…

Read More

गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी:चिनूक हेलिकॉप्टरमधून 3 किमी उंचीवरून सोडण्यात आले; पॅराशूटसह समुद्रात सुरक्षित लँडिंग

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या तयारीमध्ये मोठे यश मिळाले आहे. इस्रोने शुक्रवारी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी (IADT-1) यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या पॅराशूट प्रणालीच्या वास्तविक परिस्थितीची तपासणी करण्यासाठी करण्यात आली. याचा उद्देश गगनयान मोहिमेपूर्वी पॅराशूट उघडण्याच्या प्रक्रियेची तपासणी करणे हा होता. ही प्रक्रिया मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षित वापसी सुनिश्चित करेल….

Read More