Headlines

Admin

एव्हिएशन मार्केटला धक्का:इराण युद्ध परिणाम… जूनपासून 7% कमी फ्लाइट्स, भाडेही वाढणार, दिल्ली-मुंबईसह छोट्या शहरांच्या रूट्सवर कपात

देशातील दोन मोठ्या एअरलाइन्स एअर इंडिया आणि इंडिगो जूनपासून देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करणार आहेत. एटीएफच्या विक्रमी किमती आणि पश्चिम आशिया संकटाच्या परिणामाने एअरलाइन्सचा खर्च वाढवला आहे. बाजारात ९०% पेक्षा जास्त हिस्सेदारी असणाऱ्या या दोन्ही एअरलाइन्सच्या कपातीचा परिणाम भाड्यावरही पडेल. दोन्ही कंपन्यांनी ९० दिवसांसाठी देशांतर्गत नेटवर्क मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये २८%…

Read More

नीट पेपरफुटी:6 दिवसांपूर्वीचा साक्षीदार डाॅ. शिरुरेसह पुण्यातील क्लासचा शिक्षकही अटकेत, बालरोगतज्ज्ञ शिरुरे, तेजस शाहला 5 दिवसांची सीबीआय कोठडी

नीट पेपरफुटीप्रकरणी २१ मे रोजी लातूर येथून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला ताब्यात घेऊन त्याला सीबीआयचा साक्षीदार बनवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या तपासात शिरुरेने मुख्य आरोपी, केमिस्ट्री पेपरसेटर लातूर येथील प्रा. पी. व्ही. कुलकर्णीकडून लीक झालेले . नीट प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या प्रा. मनीषा हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते, असे सीबीआयच्या निदर्शनास आले. या कारवाईमुळे…

Read More

सिद्धिविनायक कॉरिडॉरमुळे प्रभादेवीत संघर्षाची ठिणगी:मैदानावरील पार्किंगवर रहिवाशांनी घेतला आक्षेप

सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील ऐतिहासिक नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंगच्या निर्णयाने विकासाच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी या निधीतून उभारल्या जाणाऱ्या सुविधांमुळे स्थानिक रहिवाशांच्या हक्काच्या मोकळ्या जागेवर गदा येत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून आता उबाठा आणि स्थानिक रहिवासी…

Read More

मुंबई, पुणे, ठाण्यात सोसायट्यांतील ‘कुर्बानी’ला नागरिकांचा विराेध:निषेधानंतर पोलिस-प्रशासनाकडून उघड्यावर कत्तलीस मनाई

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्यातील मीरा रोड आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कुर्बानीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये आणि सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शवल्याने प्रशासकीय पेच वाढला आहे. या वादानंतर मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. उघड्यावर कुर्बानी देण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली. मुंबईतील घाटकोपर आणि गोरेगाव येथील काही…

Read More

विधान परिषद निवडणूक:संभाजीनगर-नाशिकच्या जागेचे स‌र्वाधिकार दिले फडणवीसांना, दिल्लीत अमित शाह यांनी स्पष्ट केली भूमिका

१८ जून रोजी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या काही जागांवर दावा केला होता. त्यासाठी जागांच्या अदलाबदलीचीही तयारी दाखवली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांनी दोनदा दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि जागावाटपात तुम्हीच…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई

पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी धडक कारवाई केली असून, पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 अशा एकूण 40 उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासह…

Read More

पेरणी हंगाम पूर्वीच आर्वीत बनावट बोगस बियाणे रॅकेटवर धाड:आर्वीत २९ लाखांचे बोगस बियाणे जप्त

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. आर्वी तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे एका गोदामावर छापा टाकून तब्बल २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये किमतीचा एचटीबीटी (HTBT) बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय आरोपीला…

Read More

मी दिल्लीला आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले:पण मी मजेत असतो, कोणाच्या पोटात दुखतंय ते बघत असतो; उपमुख्यमंत्री काय म्हणाले?

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोनपैकी एक जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत असतानाच, दुसरीकडे जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार अत्यंत आग्रही असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आज…

Read More

विधान परिषद निवडणुकीसाठी एकही नामांकन नाही:तीन दिवसांत 4 उमेदवारांनी 5 अर्ज उचलले; ईदमुळे आज सुटी

अमरावती विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल झाले नाही. बुधवारी चार उमेदवारांनी एकूण ५ अर्जांची उचल केली. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवार) १६, दुसऱ्या दिवशी (मंगळवार) २३ आणि तिसऱ्या दिवशी (बुधवार) ५ असे एकूण ४४ अर्जांची उचल करण्यात आली आहे. गुरुवार, २८ मे…

Read More

अचलपूर येथील पाटस्करांचा देहदानाचा संकल्प:पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार

अचलपूर शहरातील सरमसपूरा निवासी सुरेशराव ताराचंद पाटस्कर यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरले आहे. पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प केला असून, यामुळे समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. समाजकार्याची आवड जपणारे सुरेशराव पाटस्कर यांनी ‘मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देणं लागतं’ या भावनेतून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसह सुनबाई उपस्थित होत्या. पुण्यात…

Read More