Headlines

मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला

शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या…

Read More

आरटीई प्रवेशासाठी २९ मे अंतिम तारीख:प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. शिक्षण विभागाने ही अंतिम तारीख निश्चित केली असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश या मुदतीत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील २२७ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत एकूण २ हजार ५८६…

Read More

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 70 लाखांची फसवणूक उघड:पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये दोघांना केली अटक

पुणे पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशी कॉल सेंटरसाठी प्रकल्प आणि सेटअप उभारून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने तब्बल ७० लाख ८५ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर:दुपारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू; नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण

अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली यादी २९ मे रोजी जाहीर होणार असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनमधील तपशील पूर्ण करण्याची अंतिम मुदत २५ मे रोजी संपली आहे. ही यादी शुक्रवार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर केली जाईल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना…

Read More

पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात….

Read More

कोठडीतील आरोपीला घरचे जेवण देणे पडले महागात:कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित, एस.पी. डॉ. नीलाभ रोहन यांचे आदेश

कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस जमादाराला चांगलेच महागात पडले असून संबंधित जमादाराला सोमवारी ता २५ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले आहेत. कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत कळमनुरी शहरांमध्ये दिनांक 23 मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.या प्रकारात तातडीने आरोपींची…

Read More

अवकाळी पावसाने वेरूळला झोडपले!:अर्धा तास चाललेल्या पावसामुळे लेणी परिसर जलमय, पर्यटकांची तारांबळ; बळीराजा पुन्हा चिंतेत

वेरूळ व परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे संपूर्ण वेरूळ परिसर जलमय झाला. अचानक आलेल्या पावसामुळे…

Read More

रमाई साहित्य संमेलन 30 मे रोजी:रमणी सोनवणे अध्यक्ष; पुणे येथे एकदिवसीय आयोजन

महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, ३० मे २०२६ रोजी पुणे येथे एकदिवसीय ‘रमाई साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवयित्री, लेखिका, व्याख्याती आणि अभिनेत्री रमणी सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१…

Read More

'शांत मन – द सीक्रेट ऑफ लाईफ' पुस्तकाचे प्रकाशन:मनाची शांती समजण्यासाठी नैसर्गिक नाते गरजेचे – डॉ. संप्रसाद विनोद

आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी ‘मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज’ असल्याचे मत व्यक्त केले. लेखक कौस्तुभ साबळे यांच्या ‘शांत मन – द सिक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आयुष प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ….

Read More

गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या…

Read More