Headlines

शाळेच्या पहिल्याच दिवशी खोलीचा स्लॅब कोसळला:मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; लोखंडी गज पूर्णपणे गंजले; भिंतींनाही तडे‎

. तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी धक्कादायक प्रकार समोर आला. उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस असल्याने, ग्रामपंचायतीने नुकतीच रंगरंगोटी केलेल्या व विविध शैक्षणिक चित्र आणि आकर्षक ‘तारांगण’ रेखाटलेल्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना बसवण्याचा शिक्षकांचा बेत होता. मात्र, विद्यार्थी प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अचानक या वर्गखोलीचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यावेळी खोलीत कोणीही नसल्याने मोठा…

Read More

…तर बोगस बियाणे कंपन्यांचे कार्यालय जाळून टाकू- कडू

‘शेतकरी नैसर्गिक संकटांशी झुंज देत असतानाच बोगस व निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा कंपन्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांचे कार्यालय जाळून टाकू,’असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे पीक, वर्षभराचा उदरनिर्वाह आणि आर्थिक कणा उद्ध्वस्त होत असल्याने दोषींना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा करावी, अशी त्यांनी…

Read More

निळवंडेच्या कामाचे तीन महिन्यातच पितळ उघडे:तळाचे काँक्रीट 2 ते 3 फूट फुगले, जागोजागी छिद्रे पाडल्याने पाणी शेतात; पिके सडल्याने शेतकरी आक्रमक

तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अकोले तालुक्यातील बहिरवाडी शिवारात, अकोले ते शेरणखेल रस्त्यालगत कालव्याच्या मध्यभागातील तळाचे सिमेंट काँक्रीटचे स्लॅब तब्बल २ ते ३ फूट उंचीपर्यंत फु . भूमिगत पाइपलाइन हाच कायमस्वरूपी उपाय ^ज्या भागात कालव्याशेजारील शेतांमध्ये पाणी घुसले आहे, तेथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता केवळ…

Read More

वणीत लाईन-लेव्हलचा बोजवारा, उघडे पाईप अन् निकृष्ट चेंबरबांधणीने संताप:शाहू महाराजनगरमधील प्रकार; अवघ्या 10 इंची पाईपचा वापर‎

शहरातील शाहू महाराजनगर येथे पेसा अंतर्गत ठक्करबाप्पा योजनेतून सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामावर नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. लाखो रुपयांचा शासकीय निधी खर्च करूनही अनेक ठिकाणी पाईप उघड्यावर पडलेले असून, चेंबरची उभारणी जुन्या सिमेंटच्या गटारीवरच करण्यात आल्याचा आरोप होत आहे. लाईन-लेव्हल न राखता आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याने या योजनेच्या गुणवत्तेबाबत…

Read More

नदीचे खोलीकरण ठरले वरदान; चारनेरच्या जुना नदीला पाणी:परिसरातील दीड हजार एकर शेतीला होणार फायदा‎

चारनेरवाडी शिवारातील डोंगर परिसरातून वाहणाऱ्या जुना नदीचे खोलीकरण केल्याचा सकारात्मक परिणाम अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर दिसून आला आहे. खोलीकरणामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला असून नदीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा दिलासा मिळाला असून सुमारे एक हजार ते दीड हजार एकर जमीन ओलिताखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे….

Read More

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार:दहेगाव बंगला येथील घटना, ट्रकचालक ताब्यात‎

संभाजीनगर -पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला परिसरात मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. राजू उत्तम नामेकर (४५) आणि बाबासाहेब शिंदे (५२ , दोघेही रा. दहेगाव) अशी मृतांची नावे आहेत. १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास राजू उत्तम नामेकर आणि बाबासाहेब शिंदे हे दोघे आपल्या…

Read More

कन्नड शहरात 60 किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यास सुरुवात:दोन पाण्याच्या आणि एक साठवण टाकीचे काम प्रगतिपथावर‎

शहरातील ५५ हजार जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेअंतर्गत कन्नड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरू असलेल्या भूमिगत पाणी साठवण टाकीही बांधण्यात…

Read More

बाबा फर्जनच्या 65 कोटींच्या संपत्तीवर 30 वर्षांनी परतलेल्या मुलांचा दावा:‘ही आमच्या वडिलांची संपत्ती असल्याने त्यावर आमचाच दावा,’ फिरदोस फर्जनची ‘दिव्य मराठी’ला माहिती

शहरात ९०च्या दशकातील कामगार नेता व डॉन बाबा फर्जनच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी असल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण घबाड समोर आले आहे. या संपत्तीचे मूल्य सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. यानंतर छावणी पोलिसांनी फर्जनच्या मुलांना चौकशीसाठी बोलावले होते. एक मुलगा फिरदोस फर्जन हजर झाला आहे. त्याने ‘दिव्य मराठी’शी केलेल्या संवादात, ही…

Read More

केंद्रात दोन, राज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदे यांची दिल्ली वारी:इकडे फडणवीसांसोबत वर्षावर जयंत पाटील, तटकरे, पटेलांची बैठक

‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धवसेनेचे सहा खासदार फोडल्यामुळे केंद्रीय स्तरावर शिवसेनेचे (शिंदे गट) वजन वाढवण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे तसेच राज्यात एका कॅबिनेट मंत्रिपदावर दावा केला…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:चंपत राय-मिश्रांनी हलगर्जीपणा केला, मात्र श्रीराम मंदिरातील घोटाळ्यास ‘एसबीआय’च जबाबदार- गोविंदगिरी महाराज

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरी, अपहार प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले की, ही घटना म्हणजे श्रीरामचरणी केलेले महापाप आहे. या प्रकरणात चंपत राय, मिश्रांनी हलगर्जीपणा केला. पण या घोटाळ्याला एसीबीआयच (स्टेट बँक ऑफ इंडिया) जबाबदार आहे….

Read More