Headlines

पीडितेचा ब्रेनवॉश करण्याचा कट? 171 लिंक पाठवत धर्मांतराचा प्रयत्न:निदा खान प्रकरणात नवे खुलासे; नाव बदलापासून धार्मिक विधींपर्यंत

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून, तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडित तरुणीचे केवळ मतपरिवर्तन करण्याचाच प्रयत्न झाला नाही, तर तिच्या घरात जाऊन धार्मिक…

Read More

NCP ची वास्तव लक्षात घेऊन वाटचाल:सुनील तटकरे यांचे 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य; रोहित पवारही बोलले

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या विधानावर भाष्य करत एकप्रकारे त्यांना राजकीय वास्तवाचे भान राखण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या मनात खूप इच्छा आहेत. पण राजकीय वास्तव लक्षात घेऊन आम्ही पक्ष म्हणून वाटचाल करत आहोत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे….

Read More

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच:आयात महिला नेत्याला संधी? शायना एनसी यांचे नाव आघाडीवर

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण भोवल्याने रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. महायुतीच्या सत्तावाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून, यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, पक्षातील निष्ठावंतांना डावलून या पदावर एखाद्या ‘आयात’ महिला नेत्याची वर्णी लागण्याची दाट…

Read More

उन्हाळी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यात उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष:गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे ७५० ओआरएस वाटप‎

प्रतिनिधी | अकोला उन्हाळ्याची तीव्रता आणि वाढते तापमान लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यांमध्ये ‘उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थी विकास विभागाच्या पुढाकारातून राबवण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि काळाची गरज ओळखणारा ठरत आहे….

Read More

पालघरमध्ये मैदानात आढळला धड नसलेला मानवी सांगाडा:खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास आला, पोलिसांकडून तपास सुरू

पालघर जिल्ह्यातील वसई येथील आनंद नगर परिसरात एका मैदानात धड नसलेला मानवी सांगाडा आणि मानवी कवटी सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी काही मुले मैदानावर खेळत असताना त्यांना हे मानवी अवशेष दिसले, त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्रावेगवान केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या…

Read More

विद्युत पुरवठ्यामधील समस्यांचा‎उद्योजकांनी बैठकीत वाचला पाढा‎:उद्योगांचे भविष्य अस्थिर, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनची वीज समस्यांवर चर्चा‎

प्रतिनिधी | अकोला अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने महावितरण अंतर्गत औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत सेलची बैठक घेण्यात आली. असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महावितरणचे अभियंते, संबंधित अधिकारी, तसेच तांत्रिक पथक उपस्थित होते. उद्योजकांनी विद्युत पुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला. यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. कधी काळी अकोल्यात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र काळाच्या ओघात संधी कमी होत गेल्या….

Read More

वाशीम-वारंगाफाटा मार्गावर दुरुस्तीची वेळ:1976 कोटींच्या महामार्गाचे तीन वर्षांतच 'पितळ उघडे'; खानापूरचित्ता शिवारात पूर्ण पॅनलच काढले

वाशीम ते वारंगाफाटा या ७६ किमी राष्ट्रीय महामार्गावर खानापूरचित्ता शिवारात रस्त्यावरील संपूर्ण पॅनलच बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी अवघ्या तीन वर्षातच दुरुस्तीचे काम करावे लागत असल्याने उदघाटन कार्यक्रमात रस्ता गुणवत्तेचेे गोडवे गाणाऱ्या लोकप्रतिनिधी चांगलेच तोंडघाशी पडल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून वाशीम ते वारंगाफाटा…

Read More

दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका:काँग्रेस, शरद पवार गटाचा मोदींना टोला; काटकसरीच्या आवाहनाचा समाचार

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनाचा खरपूस समाचार घेतला आहे. देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची. आता निवडणुका संपल्या की लगेच त्यांना त्याग आठवला. निवडणुका झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका असे म्हणता येणार नाही, असे या पक्षांनी म्हटले…

Read More

जि. प. बदली सत्र- चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे रविवारीच स्थानांतर:आज आरोग्य विभागाचा दुसरा टप्पा; विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन‎

प्रतिनिधी | अमरावती जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी १० मे रोजी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १० वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. दरम्यानच्या काळात चार विभागातील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. उद्या, सोमवारी आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या…

Read More

ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावी‎परीक्षेचा यंदाही ९५ टक्के निकाल‎:वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे फलित

प्रतिनिधी | अकोला येथील स्वर्गीय ज्योती जानोळकर विद्यालयाचा दहावी परीक्षेत यंदाही ९५ टक्के निकाल लावत यशस्वी उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित मानले जात आहे. यंदाच्या निकालात कुमारी गौरी महादेव घटाळे हिने ९४.६०% गुणासह प्रथम क्रमांक मिळवला, कुमारी श्रावणी रामकृष्ण इंगळे ९२. ८० टक्के…

Read More