Headlines

कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान

ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे मत व्यक्त केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची स्वतःची बलस्थाने होती आणि त्यांनी सभोवतालची माणसे व त्यांचे जगणे प्रामाणिकपणे मांडले, असे गोडबोले म्हणाल्या. मराठी साहित्यविश्वातील या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विदिशा विचार मंच’…

Read More

Pune Grandfather Arrested For Pocso Case; BNS Applied

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या मध्यवर्ती पर्वती परिसरात एका ७० वर्षीय व्यक्तीने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून आपल्या सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंबादास . पीडित नऊ वर्षांच्या मुलीचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी घराबाहेर गेले असताना, मुलगी तिच्या आजोबांसोबत घरात होती. रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी अंबादास जाधव…

Read More

आठवडाभरात तापमान 2.7 अंश सेल्सियसने घटले:अकाेला @ 42.2; सोमवारपर्यंत कोरडे वातावरण‎

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा भडका उडलेला असताच मे महिन्यात मात्र एकाच आठवड्यातच पारा २.२७ अंश सेल्सिअस कमी झाला. मंगळवार २८ एप्रिल रोजी ४५.२ अंश सेल्सिअस असलेला पारा मंगळवार ५ मे रोजी मात्र ४२. ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. तसेच ११ मेपर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजही मंगळवारी हवामान विभागाने वर्तवला. गतवर्षी खरीप नंतर रब्बीमध्येही…

Read More

33 वाघांसह शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन:मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 264 मचाणांवर ‘निसर्ग अनुभव”‎

निसर्ग प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, असा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडला. पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग १२ तास घनदाट वनातील २६४ मचाणांवर रात्रभर बसून निसर्गप्रेमीं . मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक ३० वाघ दिसले या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात ३० वाघ,…

Read More

खवणीत बिरोबा जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎:नजीक पिंपरीच्या ओवीकार मंडळाचा पूर्वजांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा संदेश‎

तालुक्यातील खवणी येथे श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, धुळदेव ओवीकार मंडळ (नजीकपिंपरी) यांनी धनगरी ओव्यांच्या माध्यमातून उपस्थित तरुणाईला समाजप्रबोधनाचा मौलिक संदेश दिला . ओवी जागरणातून प्रबोधन करताना ओवीकार मंडळाने सांगितले की, आमच्या पूर्वजांमध्ये विचारांची भिन्नता असली तरी त्यांच्या मनामध्ये आपुलकीचा झरा वाहत होता. मात्र,…

Read More

उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक‎

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी कमी झाले असून, मंगळवारी रात्री धरणाने उपयुक्त पाणीसाठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धरणातून विविध सिंचन योजना आणि नदीद्वारे सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत…

Read More

न्यायाधीशांनी न्यायदान, शिस्त, संवेदनशीलतेचा वारसा जपावा:प्रधान जिल्हा न्या. शिवाजी कचरे यांचे आवाहन‎

अहिल्यानगर न्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात न्यायदान, शिस्त आणि संवेदनशीलतेचा जो आदर्श निर्माण केलेला असतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळे हे एक उत्तम माध्यम आहे. न्यायाधीश आणि वकील (बार) यांच्यातील सौहार्दाचे संबंध न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी केले. अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातून बदली झालेले, नव्याने…

Read More

पोलिसांपुढे अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान:कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य- अधीक्षक सुदर्शन‎

जिल्ह्याचा विस्तार मोठा असून येथील गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे. ५० लाख लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३२०० पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ आणि सततचे व्हीआयपी दौरे व त्यासाठी बंदोबस्त हे पोलिस दलासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत नूतन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याला…

Read More

चित्ररथ, प्रभात फेरीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक:लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळातर्फे मिरवणूक‎

लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. जिजामाता प्राथमिक शाळेने “पर्यावरण रक्षण काळाची गरज’ दाखवणारा चित्ररथ तर लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने “मानव आणि वन्यजीव संघर्ष’, जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने “महाराष्ट्र ही संतांची भूमी व छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट’ यांचा देखावा असलेला चित्ररथ सादर…

Read More

हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व . मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील…

Read More