Headlines

पैठण येथील जांभूळबनात सेवेकऱ्यांचा पर्जन्यचंडीयाग:कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम

पैठण प्रशांत महासागरातील बदलांमुळे निर्माण झालेल्या एल निनोच्या प्रादुर्भावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जांभूळबनात रविवारी श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने पर्जन्यचंडीयाग करण्यात आला. देशावरचे दुष्काळाचे सावट टळावे आणि बळीराजा सुखावावा, यासाठी स्वामी चरणी सुपर्जन्यासाठी साकडे घालण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा व…

Read More

शिऊर येथील जि.प. शाळेचा लवकरच होणार कायापालट:वॉटरप्रूफिंग, फरशी, किचन शेड, रंगरंगोटीचे होणार काम

शिऊर केंद्रांतर्गत येणाऱ्या धनगर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा छताचा एक भाग पहिल्याच जोरदार पावसात कोसळल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने ही दुर्घटना शाळा सुटल्यानंतर बुधवारी घडल्याने मोठा अनर्थ टळला. याची तत्काळ दखल घेत शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी शनिवारी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि स्वतःच्या खर्चातून संपूर्ण…

Read More

नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज फैसला शक्य:मृत्युदंड की जन्मठेप यावर निर्णय

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर….

Read More

गृहिणीने दाखवले धाडस, चोराला ठणकावले – चालता हो…:‘आईसह मलाही मारलं असतं म्हणून धीर एकवटला, अन् कोयता घेऊन चोराला घरातून पिटाळून लावलं’

बीड बायपास रोडवर शिवकृपा कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोरटा एका घरात शिरला. घरात स्वाती कुलकर्णी व त्यांच्या आई होत्या. चोरट्याला पाहून त्या घाबरल्या नाहीत. उलट प्रसंगावधान दाखवत फांद्या कापायचा कोयता घेऊन त्यांनी चोरट्याला घरातून पिटाळून लावले. पहाटेचा हा थरार त्यांच्याच शब्दांत… पहाटेची वेळ होती. मी आणि माझी वृद्ध आई दोघीच घरात गाढ झोपलो होतो. पती गावाकडे…

Read More

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या या कडक शिस्तीचा आणि धडक कारवाईचा सकारात्मक परिणाम आता यंदाच्या आषाढी वारी यात्रा उत्सवातही पाहायला मिळणार असून, तसे संकेत खुद्द…

Read More

बी.टी. देशमुख यांनी अमरावतीचा पाणीप्रश्न सोडवला:श्रद्धांजली सभेत न्या. भूषण गवई यांनी केले स्मरण

अमरावती आणि बडनेरावासियांना ६० किलोमीटर अंतरावरील सिंभोरा (ता. मोर्शी) येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी उपलब्ध करून देणारे माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या श्रद्धांजली सभेत हे प्रतिपादन केले. अमरावतीकर त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे गवई म्हणाले. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बी.टी….

Read More

हिंगोलीत गुटख्याची वाहतूक करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात:एक लाखाचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हिंगोली शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी तारीख 28 सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हिंगोली शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली…

Read More

अमरावती शाळांना 128 दिवस सुट्या:237 दिवस शैक्षणिक कामकाज; उन्हाळा 36, दिवाळी 13 दिवसांची सुटी

अमरावती जिल्ह्यातील शाळांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन जाहीर झाले आहे. यानुसार, जिल्ह्यातील शाळांना एकूण १२८ दिवस सुट्या मिळतील, तर २३७ दिवस शैक्षणिक कामकाज होणार आहे. यामध्ये उन्हाळ्याची ३६ दिवसांची आणि दिवाळीची १३ दिवसांची सुटी समाविष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (माध्यमिक) सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे वेळापत्रक निश्चित…

Read More

प्रमोद दाळू अंजनगाव सुर्जी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी पुन्हा नियुक्त:जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रमोद दाळू यांची फेरनियुक्ती करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी शनिवारी या फेरनियुक्तीची अधिकृत घोषणा केली. प्रमोद दाळू यांच्या कार्याचा गौरव करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा…

Read More

येवदा येथे 'मन की बात'चे सामूहिक श्रवण:भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने केले आयोजन

येवदा येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. पंतप्रधानांच्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सामूहिक प्रक्षेपणाची सोय अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे करण्यात आली होती. या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि विकासाभिमुख…

Read More