राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण
महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन अमरवाणी फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी सादरीकरण केले. राजभवनात प्रत्यक्ष पंढरीचे चैतन्य अवतरले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पावली, फुगडीच्या तालावर…