Headlines

तिवसा येथे पक्ष्यांसाठी पाणी, दाणे उपक्रम:वन्यजीवप्रेमींकडून कडक उन्हात पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न

एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी ‘पक्ष्यांसाठी अन्न व पाणी’ हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या…

Read More

मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा, 8 दिवस कोठडी…:चित्रपट पाहायला गेलो अन् थेट जेलमध्ये पोहोचलो; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला रंजक किस्सा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आपल्या तारुण्यातील एक रंजक आणि मजेशीर किस्सा सांगितला. वयाच्या विसाव्या वर्षी पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले असताना, पत्नी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ती आपली पत्नी असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून आपल्याला चक्क तुरुंगात जावे लागले असल्याचा एक…

Read More

थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक:डॉ. अतुल कुलकर्णी यांचे महर्षी कर्वे जयंती व्याख्यानात प्रतिपादन

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘महर्षी कर्वे व्याख्यानमाले’त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ‘थॅलेसेमिया’ या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Read More

लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले….

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट!:20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

ठप्प झालेले वाहन पासिंगचे काम पुन्हा सुरू:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांनी 15 लाख वाहनधारकांचा प्रश्न मार्गी

राज्यातील रिक्षा, टॅक्सी, स्कूलबस आणि टेम्पो चालकांसमोर ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीमुळे निर्माण झालेला वाहन फिटनेस तपासणीचा गंभीर प्रश्न अखेर सुटला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहन नूतनीकरण प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ठप्प झालेले वाहन पासिंगचे काम पुन्हा सुरू झाले असून, १५ लाख वाहनधारकांना दिलासा…

Read More

कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकात खोडा घालण्याचे कारण नव्हते:कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, अशोक चव्हाणांचा पलटवार

महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात…

Read More

JNPA Container Yard Fire; Uran Blaze Engulfs Yard

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडम . दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे…

Read More

वसमतच्या तहसीलदाराचे निलंबन अन्यायकारक:कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप, नागरिकांची निलंबन मागे घेण्याची मागणी

गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात…

Read More

सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित:राज्यातील हजारो तरुणांची निराशा, विद्यार्थी आक्रमक; नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका – सुळे

राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ…

Read More