Headlines

शेतधुरे जाळण्याच्या नादात सरकारी झाडे खाक:गुन्हे दाखलची मागणी, पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिले कारवाईसाठी निवेदन‎

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. . उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे…

Read More

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎

जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील केळी, पपई, डाळिंब आणि आंब्याच्या शेकडो हेक्टरवरील बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र…

Read More

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत:सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धरले धारेवर

चिखली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चिखली गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे. शहरात १५ ते २० दिवसांनी होणार Source link

Read More

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध…

Read More

रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब, वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता‎

ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदू‎असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादन‎क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्या‎शतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्र‎राहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‎‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून अधोरेखित झाली‎आहे. शिर्डी येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते‎ क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे‎उद्घाटन करण्यात आले. यामुळे देशाची लष्करी‎सज्जता कमालीची वाढली आहे.‎ या…

Read More

राजमाता जिजाऊ नदीघाटाचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवले जाणार:विकास परियोजनेंतर्गत गोदावरी नदीकाठाचे होणार सुशोभीकरण‎

पैठण शहरातील गोदावरी नदीकाठाचा विकास साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजना’ अंतर्गत घाट बांधकामाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई येत्या सोमवा . राजमाता जिजाऊ घाटास मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली….

Read More

पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना…

Read More

गंगापुरातील विजेची कामे महावितरण मार्गी लावणार:पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रोहित्रे होणार दुरुस्त‎

लासूर स्टेशन वजनापुर येथील शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी विजेच्या समस्यांवर महावितरणविरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ३० मेपर्यंत विजेसंबंधित कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हल्लाबोल आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील गावठाण…

Read More

‘पैशांची मनीषा’ हेच पेपर फुटीचे कारण- सीबीआय:पुण्यातील फिजिक्स पेपरसेटर मनीषा हवालदारची कबुली

नीट पेपरफुटीप्रकरणी अटकेतील पुण्यातील फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न फोडले. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने संभाव्य प्रश्नांच्या नोट्स जाळूनही टाकल्या, अशी कबुली तिने दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, सलग ९ दिवसांपासून लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने शनिवारी दुपारी प्रा. शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’च्या कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ वाजेनंतरही ठाण मांडून संगणकातील…

Read More

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत होते. या कारवाईत २१ लाख रोख, लॅपटॉप आणि डेटा असा एकूण ३५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स’च्या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून…

Read More