Headlines

पावसाळी अधिवेशन:विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे कामकाज, सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती ठेवली सदनासमोर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती आज सदनासमोर ठेवली. पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकीय माहिती विधानसभा सभापतींनी सदनासमोर ठेवली. तसेच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:इमारतीभोवतीचा मलबा हटवून सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम सुरू

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद…

Read More

सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली:तुम्ही अवमान तरी करू नका, सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी मंत्र्यांनाच सुनावले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून राज्य सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचा ठराव न आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मुनगंटीवार यांनी मंत्री जयकुमार रावल यांना या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. तसेच, या प्रलंबित…

Read More

अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल:'सरकार धंदा करायला बसलेली नाही; जनतेला सवलत देणं हेच सरकारचं काम'

राज्य सरकारचे काम नफा-तोटा पाहणे नसून जनतेला सवलती देणे आणि रोजगार निर्माण करणे हे आहे. सरकार धंदा करायला बसलेली नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीजदर, समान नागरी संहिता (UCC), कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले….

Read More

मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या कामकाजावर टीका करणे हा लोकशाहीतील विरोधकांचा अधिकार असून, त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, अजित पवारांच्या अपघाताची…

Read More

आमदार संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरण:पोलिसांच्या भूमिकेवर प्रशांत आंबींची तीव्र नाराजी, म्हणाले- 'सत्ताधारी आणि गरिबांसाठी न्याय वेगळा आहे का?'

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीप्रकरणी कारवाईला गती मिळत नसल्याने प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सदर खटला मागे घेण्याच्या सूचना दिल्याने, आता या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा सत्र…

Read More

घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणाच नाही:मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे नियोजनाचा अभाव, पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत करा- ॲड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. “घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा…

Read More

पुणे तिथे काय उणे:पुण्यातील बावधन भागात ओढा बुजवून बांधकाम; नागरिकांच्या घरात पाणी, सुप्रिया सुळेंची तात्काळ कारवाईची मागणी

पुण्यातील बावधन बुद्रुक भागात एका बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह (केतकीचा ओढा) पूर्णपणे बुजवून प्लॉटिंग व बांधकाम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा…

Read More

महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार:जनतेला फसवण्याचे नवे फंडे शोधण्यात सरकार व्यस्त, आमदार भास्कर जाधवांची खोचक टीका

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुहास कांदे जे काही बोलले असतील, त्यामध्ये 100 टक्के तथ्य आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आल्याची टीका केली. आमदार भास्कर जाधव…

Read More

पुनीत बालन ग्रुपकडून वारीतील पोलिसांना 9 हजार किट:आषाढी वारी बंदोबस्तासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ने 9 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले आहेत. या किटमुळे पोलिसांची गैरसोय टळणार असून, त्यांना वारकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा देता येणार आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. यात कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज,…

Read More