Headlines

राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार:"मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हणत केली खिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार एका वर्षात कोसळेल, या केलेल्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेसारखे केवळ एक दिवास्वप्न असून, त्यात वास्तवाचा लवलेशही नाही, असे फडणवीस रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी…

Read More

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकेत:मुंढवा पुलावरून उडी मारलेल्या तरुणीच्या प्रेमप्रकरणातून कारवाई

प्रेमप्रकरणातून एका उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणीने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. तरुणीचा भाऊ निखील चारुदत्त अष्टेकर (वय २२) याने खराडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे….

Read More

सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक

सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राजेंनी आपापल्या नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली असून, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या कामकाजात यापुढे कोणताही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा…

Read More

एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जात असतात:विधान परिषदेच्या जागा वाटपावरही केले महत्त्वाचे विधान; पेट्रोलचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे. सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा…

Read More

राज्यात इंधन साठा मुबलक:अफवांवर विश्वास ठेवू नका, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन त्यांनी पंढरपूर येथून केले आहे. इंधनाची उगाचच साठवणूक करण्यापेक्षा गरजेनुसारच खरेदी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले….

Read More

संसद रत्न 2026 पुरस्कार जाहीर:डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ यांच्यासह पाच जणांची निवड; जुलैमध्ये दिल्लीत होणार गौरव सोहळा

संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या एकूण १२ खासदारांपैकी ५ खासदार महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये लोकसभेतील…

Read More

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या…

Read More

संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा ४ जूनला समारोप:कुमारमंगलम बिर्ला मुख्य अतिथी, सरसंघचालक मोहन भागवत करणार उद्बोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ (द्वितीय वर्ष) चा समारोप समारंभ ४ जून रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि पद्मभूषण सन्मानित उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत समारंभाचे मुख्य उद्बोधन करतील. ‘कार्यकर्ता विकास वर्ग’…

Read More

Mahavitran Solar Scheme: 1kW Solar System for Rs 2500

भारत सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन व महावितरणच्या वतीने 1 किलोवॅटची छतावरील सोलर सिस्टीम योजना विशेष स्मार्ट योजना नावाने राबविण्यात येत आहे. ही योजना अनुदानावर आधरित असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले. . एक किलोवॅट छतावरील सौरऊर्जा प्रणालीस केंद्र व राज्य् शासनाकडून अनुदान उपलब्ध् असणार आहे. महावितरणकडुन राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सौर प्रणालीसाठी भारतीय…

Read More

हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी अधिकृत वाहने तसेच काही खाजगी संस्थांना डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. जिल्हा परिषद हिंगोलीचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 136 इन्क. बटालियन, टाटा…

Read More