राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार:"मुंगेरीलाल के हसीन सपने" म्हणत केली खिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार एका वर्षात कोसळेल, या केलेल्या दाव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या मालिकेसारखे केवळ एक दिवास्वप्न असून, त्यात वास्तवाचा लवलेशही नाही, असे फडणवीस रविवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी…