Headlines

7 दुष्काळी गावांचा सिंचन योजनेत होणार समावेश:जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश‎

माढा तालुक्यातील सीना – माढा उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित राहिलेल्या दुष्काळी ७ गावांचा समावेश करणे, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देणे आदीसह तालुक्याच्या सिंचन प्रश्नावर कार्यवाहीचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सीना– माढा उपसा सिंचन योजना तसेच खैराव- मानेगाव…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आठ जणांचा शोध अद्याप सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीचे निर्देश, बचावकार्याला गती

मोशी येथील कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला आता ६५ तासांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही ढिगाऱ्याखाली दबलेल्या ८ बेपत्ता कामगारांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि महापालिका प्रशासनाकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा…

Read More

शरद पवारांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक:NDA मध्ये जाण्याच्या चर्चा; चार दिवसांपूर्वीच झाली होती शिंदे-पवार भेट

NCP(SCP) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत झालेल्या बदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एनडीएमध्ये सामील होण्याबद्दल किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही चर्चा आहेत. तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या…

Read More

30 कोटींचे कंत्राट 43 कोटींवर कसे गेले; ‘कोणार्क’च्या निविदेची चौकशी:वादग्रस्त कंपनीविरुद्ध सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये‎

. शहरातील स्वच्छतेचे धिंडवडे काढणारी स्वच्छता कंत्राटदार कंपनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या एकूणच कामातील अनियमिततेसह वादग्रस्त निविदा प्रक्रियेची विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी करण्याचे आदेश शासनाच्या वतीने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत गुरुवारी ९ रोजी दिले. सोबतच ९० दिवसांत अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही दिली. त्यामुळे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना…

Read More

विदर्भात आज पावसाचा इशारा:पुढील आठवड्यात राज्यभर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी गेल्या काही दिवसांतील धुव्वाधार पावसाने सर्व कसर भरून काढली आहे. सध्यातरी राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी पावसाचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मुंबईकरांसह…

Read More

वाजले टाळ-मृदंग, दुमदुमली राहुरी नगरी:निवृत्तीनाथांची पालखी चालली पंढरपुरी!, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या उधळणीने वारकऱ्यांचे स्वागत‎

. आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे राहुरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा…

Read More

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा:बनावट, खते निविष्ठांपासून सावधान राहा, दापोरीत फलोत्पादन पिकांच्या कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण‎

“हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना विशेष दक्षता घेऊन बनावट कृषी निविष्ठांपासून स्वतःचा बचाव करावा. माती परीक्षणावर आधारित अल्प खर्चिक नैसर्गिक शेतीकडे वळावे,” असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील दापोरी येथे कृषी विभागातर्फे सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित “फलोत्पादन पिकांवरील कीड…

Read More

दहा दिवसांत पीक विमा द्या, अन्यथा सरण आंदोलन:निफाड येथे आयाेजित पीक विमा योजना तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा‎

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे ९० टक्के पीक हातचे गेल्यानंतरही विमा कंपनीने उत्पन्नात घट नाही, असे कारण देत सर्व दावे फेटाळल्याने देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. . तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थित झालेल्या तालुकास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढाच…

Read More

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎

कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…

Read More

फुलंब्री येथील पेट्रोल पंपासमोर कार, दुचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू:पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत असताना भरधाव कारने दिली जोराची धडक‎

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्री येथील मानकापे पेट्रोल पंपासमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. सुमित गजानन डकले (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) असे म . मिळालेल्या माहितीनुसार, सुमित हा आपल्या आईला दुचाकीवरून (एमएच २० सीके ८१२१) ने घेऊन फुलंब्री येथे आला होता. आईला उतरवून…

Read More