पुढील ५ दिवस उकाड्यापासून सुटका नाही:दोन दिवस रेड अलर्ट; त्यानंतरही तीन दिवस चटके कायम, पूर्वमोसमी पावसाकडे लक्ष
प्रतिनिधी | अमरावती सलग दोन आठवड्यांपासून अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पुढील पाच दिवस अमरावतीकरांना या जीवघेण्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. २९ मेपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला…