Headlines

पुण्यात 400 कोटींची मोठी गुंतवणूक:'अग्रेको इंडिया'सोबत सामंजस्य करार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील 10 वर्षांत सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या…

Read More

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सायबर फसवणूक:बनावट खाते बनवून केली पैशांची मागणी; सायबर सेलकडे तक्रार दाखल

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग नागरिकांना यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबाबत सातत्याने सतर्क करत आहे. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून भावनिक मेसेजद्वारे पैशांची मागणी करण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यात आता सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारीही सायबर भामट्यांचे लक्ष्य होत असून, नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर…

Read More

पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांनी १५ तोळे सोन्याची बॅग परत केली:प्रवाशाचा मौल्यवान ऐवज सुरक्षित, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाली आहे. मेट्रो प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वय आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना पुणे मेट्रो स्थानकावर घडली. आरटीओ पुणे मेट्रो स्थानकावर एका प्रवाशाची बॅग बॅगेज स्कॅनिंग मशीनजवळ विसरली असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक (पीआरएस) मेट्रो स्थानकातील स्थानक नियंत्रकांना…

Read More

राजगडमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने हल्ला:हवेत गोळीबार, जुना वाद, दोघे जखमी; दोन संशयित ताब्यात

राजगड (वेल्हा) तालुक्यातील कोदवडी फाट्यावरील हॉटेल ‘श्रीनाथ’ येथे जुन्या वादातून हॉटेल मालक आणि कामगारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी हवेत गोळीबार करत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेलचे…

Read More

पंतप्रधान मोदींना 'महागाई रत्न' पुरस्कार:महागाई वाढवल्याचा आरोप करत पुणे महिला काँग्रेसने केली पुरस्काराची घोषणा

पुणे शहर महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई रत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत महागाईचा कळस गाठल्याचा आरोप करत, या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याची घोषणा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली. महिला काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येण्याची विनंती करणारे पत्र…

Read More

विधानपरिषद निवडणूक लांबणीवर टाका:आमदार रोहित पवार यांची मागणी; इंधन टंचाई अन् निवडणुकीतील घोडेबाजाराचा दिला दाखला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील इंधन टंचाईचा दाखला देत विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात तर जमावबंदीचे आदेश लागू झालेत. अशा स्थितीत विधान परिषद निवडणूकी घेण्याची गरज आहे का? ही निवडणूक पुढे ढकललेलीच बरी, असे ते म्हणालेत. विधान…

Read More

Latur Student Suicide After NEET Paper Leak; Mathili Sonawane

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे रद्द झाल्याचा मोठा धक्का देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील एका १८ वर्षीय विद्य . मैथिलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले अत्यंत गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मैथिली सोनवणे हिने नीट परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट केले होते….

Read More

भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक:तब्बल 13.92 कोटींची रोकड, मर्सिडीज कार आणि किलोभर सोने-चांदीचे दागिने जप्त

स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या आणि आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या अशोक कुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतून अटक केली आहे. ईडीच्या मुंबई आंचलिक कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली. आरोपी खरातला १९ मे २०२६ रोजी धन शोधन निवारण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली…

Read More

पत्नीला माहेरी सोडून 4 मुलांना विहिरीत ढकलले:नंतर बापानेही केली आत्महत्या, बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भयंकर घटना

एका व्यक्तीने पत्नीला माहेरी सोडल्यानंतर 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची भयंकर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडली आहे. या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मुसा किराडिया असे मृत व्यक्तीचे…

Read More

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना…

Read More