डिजिटायझेशनमध्ये विदर्भाची बाजी:एसआयआर मोहिमेत मुंबई-पुणे मागे; मराठवाड्यासह विदर्भ पुढे, चंद्रपूर, हिंगोलीमध्ये अव्वलची चुरस
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेने वेगाचा उत्तरार्ध गाठला असला तरी राज्याच्या प्रशासकीय कामगिरीत कमालीची तफावत समोर आली आहे. १० जुलै २०२६ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील ९.७८ कोटी मतदारांच्या या महाअभियानात मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये कोट्यवधींची आणि हजारो बीएलओची “फौज’ दिमतीला असूनही ही महानगरे कासवगतीवर आहेत. याउलट कमी मनुष्यबळ आणि विपरीत परिस्थिती असलेल्या मराठवाड्याने फॉर्म वाटपात आपला डंका…