Headlines

वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला:जीव वाचवण्यासाठी पळापळ, 40 मुले जखमी; आगाशिव डोंगरावरील घटना

निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण आणि ‘सीडबॉल’ (बीज गोळे) प्रत्यारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कराडजवळील आगाशिव डोंगरावर हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उडालेल्या गोंधळात आणि मधमाशांच्या दंशामुळे सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, शिक्षकांनी दाखवलेली तत्परता आणि वेळेवर…

Read More

'4 BIN HAR DIN' अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद:मनपा IEC टीमच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळीतून जनजागृती

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ‘4 BIN HAR DIN’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १८ मधील जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलाल नगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मनपाच्या IEC (माहिती, शिक्षण आणि संवाद) टीमने विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन २०२६ च्या नवीन…

Read More

राऊतांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरून हिंदूंची बदनामी करण्याची सुपारी घेतलीय:मुंबई मनपावर सत्ता असताना कोणत्या गुजराती कंत्राटदारांना कामे दिली मनसेकडून यादी मागवा- बन

कोण चंपतराय आहेत आणि कोण संपतराव आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आज जी अधोगती झाली आहे आणि ‘उबाठा’ गटाची जी बिकट अवस्था झाली आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार केवळ आणि केवळ संजय राऊतच आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टोला लगावताना…

Read More

खडसेंची थेट दिल्लीत हॉटलाईन असेल:मी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो अन् नाही, बच्चू कडू मोठे नेते, रोज काहीही बोलतात- गिरीश महाजन

राज्यात अचानक मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले असून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, फडणवीसांचे निकटवर्तीय चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला होता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा करून खळबळ…

Read More

पंढरपूर कॉरिडॉर बाधितांनी जागा विक्री अधिकार बिल्डरांना देऊ नये:डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुनर्वसनाचे लाभ बाधितांना मिळावेत‎

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या मूळ बाधितांनी कोणालाही सहजपणे जागा विक्री अधिकार देऊ नयेत. पुनर्वसनातून सर्वाधिक आर्थिक व सामाजिक लाभ मूळ नागरिकांनाच मिळाला पाहिजे, यासाठी आग्रह राहील, असे शिवसेना नेत्या तथा माजी उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स् . या बैठकीत २२ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र, घर व दुकान जागेच्या बदल्यात नेमका कोणता…

Read More

केवळ झाडे लावणे, ती जगवणे हीच खरी सेवा:आलेगावात होणार 70 वडांचा वाढदिवस‎, विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली ‎पर्यावरण रक्षणाची शपथ‎

. दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात…

Read More

अकोल्यात पावसाची प्रतीक्षा कायम:दहा दिवसांनंतरच आगमनाचा अंदाज, गतवर्षीच्या तुलनेत 46 मिमी कमी पाऊस; जिल्ह्यातील धरणे अजुनही तहानलेली‎

अकोला सध्या अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पुढील आठ ते दहा दिवस दमदार पावसाची शक्यता कमी आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन””मुळे (चक्रीवादळ सदृश स्थिती) मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलली आहे. हे बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दक्षिणेकडे म्हणजेच श्रीलंकेकडे वळले आहेत. तसेच, गुजरात, राजस्थानमधील अधिक तापमानामुळे काही वारे…

Read More

युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार‎

प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…

Read More

ॲप्रोच चॅनल तयार करण्यासाठी धरणात ब्लास्टिंग करावे लागणार:रोज 5 कोटी लिटर पाणी वाढले; मात्र ॲप्रोच चॅनलचे काम 4 महिने रखडले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार यांच्यातील वादामुळे १६ दिवसांपासून बंद असलेला नवीन पाणीपुरवठा अखेर सुरू झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेल्या ताकिदीनंत . नक्षत्रवाडी पंपहाऊसला पावसामुळे लागलेली गळती आणि मुख्य जलवाहिनीवरील ५३ नादुरुस्त व्हॉल्व्हचे कारण देत एमजेपीने २४ जूनपासून जायकवाडीतून पंपिंग बंद ठेवले…

Read More

फुटपाथ गायब, पादचारी रस्त्यावर, ग्राहक पंचायत अतिक्रमणांविरोधात आक्रमक:मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, नागरीकरण वाढले, सुविधा घटल्या‎

शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे फुटपाथ आणि पादचारी मार्गांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांचे संविधानिक अधिकार अबाधित ठेवावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र अकोले तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जून २०२६ च्या आद . अकोले शहराचे नागरीकरण वेगाने वाढत असून अगस्ती सहकारी साखर कारखाना, मुख्य बाजारपेठ आणि शाळा-महाविद्यालयांमु ळे कोल्हार-घोटी रस्त्यासह इतर प्रमुख मार्गांवर…

Read More