Headlines

औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू:रांजळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरण:अमित देशमुखांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले- यात माझे नाव जोडणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, त्यांचे काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाषण करतानाचे आणि देशमुख कुटुंबीयांशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय टीका-टिप्पणी होत असून, या पेपरफुटीमुळे राज्यभरात नावाजलेला लातूर पॅटर्नही बदनाम होत असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आता लातूरचे आमदार आणि…

Read More

पालघरमध्ये एसीबीची मोठी कारवाई:45 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल महिला अधिकारी रंगेहात जाळ्यात; नवी मुंबईतही मोठी कारवाई

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई सुरू ठेवत शिपायापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या या कारवाईचा धाक निर्माण झाला असला, तरी लाचखोरीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून, पालघर एसीबीने पेल्हार ग्रामपंचायतीच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील…

Read More

देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात:जलव्यवस्थापनासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जल व्यवस्थापन करण्यासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर ‘पाण्याचा सातबारा’ देशात प्रथम महाराष्ट्रात विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत आज मंत्रालयातील बैठकीत याबाबतचे भक्कम पाऊल टाकण्यात आले. जलव्यवस्थापन करणाऱ्या ‘अक्वेरियम’ या संस्थेने यासाठी ‘वॉटर ऑडिट’ आणि ‘बॅलन्सशीट’ची संकल्पना मांडली असून, ही अभिनव…

Read More

बुलढाण्यात इंधन टंचाई नियंत्रणात:घाबरून न जाता मशागतीची कामे सुरू ठेवा; जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र असताना, बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत, जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला सुरळीत इंधनपुरवठा करण्याची हमी प्रशासनातर्फे घेतली जात असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासनही दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ज्या…

Read More

पुण्यात 400 कोटींची मोठी गुंतवणूक:'अग्रेको इंडिया'सोबत सामंजस्य करार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील 10 वर्षांत सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या…

Read More

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सायबर फसवणूक:बनावट खाते बनवून केली पैशांची मागणी; सायबर सेलकडे तक्रार दाखल

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग नागरिकांना यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबाबत सातत्याने सतर्क करत आहे. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून भावनिक मेसेजद्वारे पैशांची मागणी करण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यात आता सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारीही सायबर भामट्यांचे लक्ष्य होत असून, नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर…

Read More

पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांनी १५ तोळे सोन्याची बॅग परत केली:प्रवाशाचा मौल्यवान ऐवज सुरक्षित, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाली आहे. मेट्रो प्रशासनाच्या उत्कृष्ट समन्वय आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना पुणे मेट्रो स्थानकावर घडली. आरटीओ पुणे मेट्रो स्थानकावर एका प्रवाशाची बॅग बॅगेज स्कॅनिंग मशीनजवळ विसरली असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक (पीआरएस) मेट्रो स्थानकातील स्थानक नियंत्रकांना…

Read More

राजगडमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने हल्ला:हवेत गोळीबार, जुना वाद, दोघे जखमी; दोन संशयित ताब्यात

राजगड (वेल्हा) तालुक्यातील कोदवडी फाट्यावरील हॉटेल ‘श्रीनाथ’ येथे जुन्या वादातून हॉटेल मालक आणि कामगारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी हवेत गोळीबार करत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेलचे…

Read More

पंतप्रधान मोदींना 'महागाई रत्न' पुरस्कार:महागाई वाढवल्याचा आरोप करत पुणे महिला काँग्रेसने केली पुरस्काराची घोषणा

पुणे शहर महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई रत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत महागाईचा कळस गाठल्याचा आरोप करत, या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याची घोषणा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली. महिला काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येण्याची विनंती करणारे पत्र…

Read More