Headlines

पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला?…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का?:14 ते 15 आमदार फुटण्याचा रामदास आठवलेंचा दावा; पुन्हा होणार 'ऑपरेशन टायगर'

ठाकरेंची साथ सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

धडकेनंतर दोन्ही ट्रक बनले आगीचा गोळा:खंडाळ्यात 2 वाहने जळून खाक, संदेश कार्ले व ग्रामस्थांनी मृत्यूच्या जबड्यातून तिघांना काढले बाहेर‎

अहिल्यानगर–दौंड महामार्गावर अहिल्यानगर तालुक्यातील खंडाळा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. मात्र, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संदेश कार्ले व स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या . एका ट्रकचा चालक काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दुसऱ्या ट्रकमध्ये चालक…

Read More

पावसाने दांडी मारल्याने चारा संकट;प्रति गुंठ्यासाठी मोजावे लागताहेत 1500 रु:53 लाख पशुधनाचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादकांचा खर्च वाढल्याने चिंतेत भर‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने कडवळ चारा प्रति गुंठा मागील वर्षी ९०० रुपये तर यंदाच्या वर्षी १५०० रुपये मोजावे लागत आहेत. सदर चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील पशुपालकांना मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुपटीने चाऱ्यासाठी किंमत मोजावी लागण्याची वेळ आली आहे. तर जिल्ह्यातील गाय म्हैस १२ लाख ४१ हजार…

Read More

अकलूजमध्ये पोलिसांचे मॉक ड्रिल:अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे, बॉम्ब निकामी करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक‎

सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ज्ञानार्जनात तल्लीन असताना अचानक सायरनचा आवाज करत एकामागून एक पोलिस गाड्या या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या, त्यातून पटापट पोलीस अधिकारी उतरले, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले व पोलिस शिपाई सावधपणे आपल्या बंदुका सावरत सावजाचा शोध घेऊ लागले. वरिष्ठ त्यांच्या भाषेत आज्ञा करत असतानाच अचानक एकाला घेऊन चौघे शिपाई आले आणि सगळ्यांनी सुटकेचा…

Read More

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा:छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 5 दिवस पावसाची शक्यता, कसे राहील हवामान?

जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याला चांगलेच झोडपून काढले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने राज्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच, भारतीय हवामान विभागाने एक मोठा आणि दिलासादायक इशारा दिला आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात…

Read More

तहसील कार्यालयातील पार्किंगच्या जागेवर जप्त वाहने; नागरीक त्रस्त:नागरिकांची गैरसोय, वाहने हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक‎

चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत.या वाहनांमुळे तेथील पार्किंगच्या जागा तोकडी झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी एसडीओंना निवेदन सादर करीत ही वाहने तत्काळ हटवण्याची मागणी केली. हे ट्रक व ट्रॅक्टर गेल्या काही…

Read More

19 ते 28 जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदा सोहळ्याचा गंगा आरतीने होणार प्रारंभ

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दि. १९ ते २८ जुलै या कालावधीत विविध धार्मिक . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:गंज बाजारात नवे भाजी मार्केट, व्यापारी संकुल; अतिक्रमणांची समस्या सुटणार

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गंज बाजार येथे असलेले जुने आणि मोडकळीस आलेले भाजी मार्केट पाडून त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त नवीन भाजी मार्केट व बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर करण्यात आला आहे. ११.७० कोटी रुपये खर्चून सुमारे साडेबारा हजार चौरस फुटांच्या जागेत हे भव्य संकुल उभे राहणार आहे. केंद्राच्या अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के रकमेचे…

Read More

जालन्याच्या नवोदय विद्यालयात रॅगिंग:सात विद्यार्थ्यांचे निलंबन, 11 वीच्या विद्यार्थ्यांकडून 9 वीच्या विद्यार्थ्याचा छळ

जालना जिल्ह्यातील परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ९वीतील एका विद्यार्थ्याची अकरावीतील ७ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या अँटी-रॅगिंग कमिटीने दोषी ७ विद्यार्थ्यांना ८ दिवसांसाठी निलंबित केले. २ जुलै रोजी या मुलाने मारहाण, धक्काबुक्की करत कपडे धुवायला लावत त्रास दिल्याची तक्रार पालकांकडे केली होती. अँटी-रॅगिंग कमिटीकडून तातडीने कारवाईचे पाऊल विद्यार्थ्याने…

Read More