जालन्यात मानवतेला काळीमा!:बाजारातून बैल घेऊन जात असताना कथित गोरक्षकांनी अडवले, मारहाण करत चालकाच्या तोंडात शेणही कोंबले
जालन्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवडी बाजारातून खरेदी केलेला बैल आपल्या वाहनातून घेऊन जाणाऱ्या एका चालकाला काही जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. या अमानुष प्रकारात संबंधितांनी पीडित चालकाला केवळ जातीवाचक शिवीगाळच केली नाही, तर त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेणही कोंबले. ही भीषण घटना 23 मे रोजी घडली…