Headlines

जालन्यात मानवतेला काळीमा!:बाजारातून बैल घेऊन जात असताना कथित गोरक्षकांनी अडवले, मारहाण करत चालकाच्या तोंडात शेणही कोंबले

जालन्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवडी बाजारातून खरेदी केलेला बैल आपल्या वाहनातून घेऊन जाणाऱ्या एका चालकाला काही जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. या अमानुष प्रकारात संबंधितांनी पीडित चालकाला केवळ जातीवाचक शिवीगाळच केली नाही, तर त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेणही कोंबले. ही भीषण घटना 23 मे रोजी घडली…

Read More

तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही केली?:मनसेच्या इशाऱ्यावर आशिष शेलारांचा पलटवार

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे अमराठी चालक आणि मराठी भाषेची सक्ती यावरून सध्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणे सक्तीचे आहे. हा आमचा आग्रह असून हीच सरकारचीही भूमिका आहे,” असे…

Read More

तिबेटमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक सुखरूप:सागा येथून काठमांडूकडे परतीचा प्रवास सुरू; प्रशासकीय पातळीवरील वेगवान हालचालींमुळे यात्रेकरूंना दिलासा

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिबेटमधील सागा येथे अडकलेले हे सर्व भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केलेल्या पुढाकारामुळे आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यामुळे या भाविकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला. सागा येथे अडकले होते भाविक ठाणे, पुणे,…

Read More

साखरेच्या दरवाढीमागे साठेबाजीचा संशय:चौकशीची गरज, पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफांचा मोठा दावा, शक्तिपीठ महामार्गावरही स्पष्ट भूमिका

साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत दर पुन्हा खाली आल्याच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या साठ्याची चौकशी करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. साखर कारखान्यांकडून दाखवला जाणारा साठा आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा यामध्ये तफावत आहे का, याची तपासणी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बाजारात मोठ्या प्रमाणावर साखर…

Read More

सीमेवरील जवानांसाठी पुण्यातील दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 5 हजार राख्या पाठवणार:पुनीत बालन यांची मेजर जनरल जोशी यांना स्वीकारण्याची विनंती

पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी 5 हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील 19 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठवून या राख्या स्वीकारण्याची विनंती केली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई…

Read More

Dharashiv Thackeray Group Action Against Defecting Councilors

धाराशिव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून झालेल्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या पक्षांतराचा वाद आता कायदेशीर वळणावर जाण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्ष सोडलेल्या १३ नगरसेवक आणि चार पंचायत समिती सदस्यांविर . धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राजकीय वातावरण तापले आहे. कळंब नगर परिषद आणि धाराशिव शहरातील नगरसेवकांच्या…

Read More

जागृती:संवाद, विचारांची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी; शिबिरातून युवकांना मिळाली समाजकार्याची दिशा

स्नेहालय संचालित युवा निर्माण प्रकल्पाच्या वतीने आयोजित ३५वे राज्यस्तरीय सामाजिक जाणीव निर्मिती शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान झालेल्या या तीन दिवसीय शिबिरात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील १६० हून अधिक युवक सहभागी झाले. ‘सामाजिक जाणिवेतून बदलाच्या कृतीकडे, युवा जागृतीतून राष्ट्रनिर्माणाकडे’ या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिबिरात सामाजिक प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव, संवाद,…

Read More

राखीचा धागा सैनिकांच्या हातावर…बीज रुजणार मातीच्या कुशीत!:बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हातून सैनिक भावांसाठी विषमुक्त गावरान बियाण्यांच्या राख्या‎

राखी पौर्णिमेनिमित्त विषमुक्त गावरान वाणांच्या निर्माती व बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाही देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिक भावांसाठी तसेच बंधूस्थानी मानलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी गावरान बियाण्यां . अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे कुटुंबीयांसमवेत राहीबाईंनी या राख्या तयार केल्या. यंदा त्यांच्या नातवंडांनी सायली व धनश्री यांनीही त्यांना मदत केली. आपल्या बीज बँकेतील…

Read More

नांदेडमधील प्रियदर्शनी शाळेत राखी पौर्णिमेचा उत्साह:भाऊ-बहिणीच्या नात्याला उजाळा

भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेचा उत्सव प्रियदर्शनी शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेमाने राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला उजाळा दिला. राखी बांधताना विद्यार्थिनींनी आपल्या भावांच्या मनगटावर प्रेमाची आणि विश्वासाची राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही बहिणींचे रक्षण करण्याचा आणि त्यांच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे…

Read More

‘बदलाव जरुरी है’साठी नांदगाव तालुक्यात 12 गावांत होणार सभा:1 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याची हाक‎

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आयोजित देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कार्यकर्ते गावागावात, वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये फिरुन दिल्लीच्या आंदोलनाची हाक देत आहेत. शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांशी थेट संवाद साधून त्यांना आगामी १ सप्टेंबरच्या दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्याची…

Read More