Headlines

लाडसावंगी ते टाकळी तयार केलेल्या सिमेंट रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी:केवळ पोते अंथरले, पाणी मारण्यात येत नसल्याने रस्ता उखडण्याची भीती‎

टाकळी ते लाडसावंगी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ढिसाळ कारभार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी विलास डमाळे यांच्या शेतापासून ते साईबाबा चौकापर्यंत नव्याने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर केवळ सुकी पोती अंथरून ठेवून त्यावर अजूनपर्यंत पाणीच मारण्यात आलेले नाही. त्यामुळे हा नवा रस्ता अल्पावधीतच उखडण्याची…

Read More

अगोदर भाव ठरवा, नंतरच मोजणी:बिडकीन येथील बैठकीमध्ये ग्रीनफील्ड मार्गासाठी शेतकऱ्यांचा एल्गार‎

शेंद्रा ते पुणे (मार्गे बिडकीन) या ग्रीनफील्ड महामार्गाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी जमीन मोजणीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शासनाने अगोदर जमिनींचा बाजारभाव निश्चित करावा, त्यानंतरच मोजणी करावी, असा एल्गार बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारला आहे. या संदर्भात बिडकीन येथे शेतकऱ्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे नियोजन अॅड. संचित पातुनकर यांनी…

Read More

यंदा गणेशमूर्ती 30 टक्केमहाग मिळण्याची शक्यता:गुजरात राज्यातील ‘माती’मधून घडतात महाराष्ट्राचे गणपती, ‘टायअप’ची मागणी

महाराष्ट्राच्या घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत पुजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती प्रत्यक्षात गुजरातच्या मातीतून घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाहतूक खर्च दुप्पट झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने जाहीर केलेला ७०० ब्रास मोफत मातीचा शासन निर्णय उशिरा निघाल्यामुळे या वर्षी त्याचा मूर्तिकारांना काडीचाही फायदा…

Read More

आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून ‘लव्ह जिहाद’चा वाद:त्यांचे चित्रपट पाहण्यापूर्वी विचार करावा- राणे, येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल- शिरसाट

अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वापेक्षा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे. या लग्नावरून राज्याचे मंत्री नितेश राणे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानवर निशाणा साधत गंभीर स्वरुपाची विधाने केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे “लव्ह जिहाद’च्या संदर्भातून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात…

Read More

मुकुंदवाडीत झाड वाचवण्यास गेलेल्या दुकानदाराचा जेसीबीच्या घावाने मृत्यू:छत्रपती संभाजीनगर मनपा म्हणते तो जेसीबी अन् चालक आमचा नाही

शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामात कंत्राटदार आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा रविवारी (12 जुलै) बळी गेला आहे. रस्त्याच्या खोदाईत झाड तुटत असल्याचे सांगण्यासाठी गेलेल्या 55 वर्षांच्या किराणा दुकानदाराला जेसीबीच्या फावड्याचा जोरदार फटका बसला. अतिरक्तस्राव झाल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. मुकुंदवाडीतील स्वराजनगरात घटना घडली. संजय पंढरीनाथ चौधरी (55, रा. स्वराजनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा…

Read More

पानशेत जलप्रलयास 65 वर्षे पूर्ण:काँग्रेसतर्फे खडकवासला धरणाची पूजा, दीप्ती चवधरींनी भरली ओटी

१२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळील पानशेत धरण फुटले होते. या घटनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे खडकवासला धरणावर जलपूजन करण्यात आले. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी धरणातील पाण्याची पूजा करून साडी-चोळी व नारळाने ओटी भरली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे सुरक्षित राहावीत, अशी…

Read More

रसदीपसिंह चावला लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष:'मेडिकल पार्क' प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देणार

लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर मिडटाऊनच्या लायनिस्टिक वर्ष २०२६-२७ चा पदग्रहण सोहळा आणि नवीन सदस्यांचा दीक्षा समारंभ १० जुलै रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात लायन रसदीपसिंह चावला यांनी अध्यक्षपदाची, लायन डॉ. विक्रांत भाले यांनी सचिवपदाची, तर लायन दीपक मुंदडा यांनी कोषाध्यक्षपदाची शपथ घेतली. पदग्रहण अधिकारी म्हणून पीएमसीसी पीएमजेएफ लायन गिरीशजी मालपानी यांनी अध्यक्ष, सचिव,…

Read More

ऑपरेशन टायगर उद्धव ठाकरेंच्या कर्माचे फलित:रामदास आठवले यांची टीका; म्हणाले – आपलेच लोक सांभाळता आले नाहीत

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडले नसून, ते उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे, असे आठवले म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रविवारी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,…

Read More

Pandharpur Ashadhi Wari ST Bus Special Service Announced by Pratap Sarnaik

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जा . पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ५,५००…

Read More