Headlines

येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत‎

राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा…

Read More

श्रीगोंदे तालुक्यात जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार:दुचाकी आणि खासगी गाड्यांमधून घातक साहित्याची होतेय धोकादायक पद्धतीने वाहतूक‎

श्रीगोंदे तालुक्यात विहिरींचे खोदकाम, शेततळे आणि दगडखाणींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या जिलेटिन आणि डिटोनेटर सारख्या घातक स्फोटक साहित्याचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संशय आणि संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट…

Read More

रामकथेसाठी भाविकांची गर्दी:‘श्रीराम जन्म’अन‌् ‘सीता स्वयंवर’ने वेधले लक्ष, उमराणेत श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मास सप्ताहाचा उत्साह‎

येथील देवस्थान असलेल्या श्री रामेश्वर महादेव मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित अखंड नामजप, कीर्तन सप्ताह, संगीतबद्ध रामकथा आणि बिल्व अर्चना पूजन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ‘राम जन्म’ आणि ‘सीता स्वयंवर’ या नाट्यमय प्रसंगां . सप्ताहादरम्यान सादर करण्यात आलेल्या संगीतबद्ध रामकथेला परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्रभू रामचंद्र आणि माता सीतेच्या विवाह सोहळ्याचे…

Read More

वेरूळला अर्धा तास गारपीट अन् पाऊस‎:खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ‎

शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली. त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. शहरात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली होती. वीटभट्टी चालकांनी मोठ्या प्रमाणावर कच्च्या विटा तयार करून त्या भाजणीसाठी व विक्रीसाठी रचून ठेवल्या होत्या. त्यांचे…

Read More

देशात पहिल्यांदाच ‘पाण्याचा सातबारा’:पाणी बचतीतून मिळणार ‘अक्वाक्रेडिट्स’, संभाजीनगरसह टंचाईग्रस्त भागांसाठी निर्णय गेमचेंजर

जमिनीच्या मालकीसाठी आपण पिढ्यानपिढ्या ‘सातबारा’ उतारा पाहत आलो आहोत. पण आता देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात ‘पाण्याचा सातबारा’ ही क्रांतिकारी संकल्पना राबवली जाणार आहे. याअंतर्गत केवळ पाण्याचा हिशोबच ठेवला जाणार नाही, तर पाणी वाचवणाऱ्या ग्रामपंचायती आ . पाणीपुरवठा आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने महसूल विभाग ही प्रणाली विकसित करत आहे. आयआयटी बॉम्बेचे जल अभ्यासक डॉ. अविनाश कदम आणि…

Read More

दंगल नियंत्रण सरावात हातात ग्रेनेड फुटून 4 पोलिस जखमी:अहिल्यानगरला बकरी ईदनिमित्त सुरू होता सराव

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सोमवारी (२५ मे) दंगल नियंत्रण व जमाव नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या सरावावेळी प्लास्टिक स्मोक स्टन ग्रेनेड हातातच फुटल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची पोलिस उपअधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले….

Read More

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास, पुणे महोत्सवात मत

ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले. रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल…

Read More

प्रत्येक दुकानदाराने समाजासाठी एक CCTV कॅमेरा लावावा:ठाणेदार सागर भामरे यांचे शांतता समिती बैठकीत आवाहन

चांदूर बाजार येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सागर भामरे यांनी प्रत्येक व्यवसायिकाला आपल्या दुकानासमोर समाजहितासाठी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन केले आहे. नगरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये…

Read More

अमरावती पाणपोई: रोज ३५ हजार नागरिकांना पाणी, दिव्यांगांना रोजगार:३७ वर्षांपासून अविरत सेवा; २ जुलैला समारोप

अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन्स कोर मैदानासमोरील ही पाणपोई गेल्या ३७ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० हजार नागरिक या पाणपोईवरून आपली तहान भागवतात. विशेष म्हणजे, या माध्यमातून दिव्यांग बांधवांना रोजगाराचा आधारही मिळाला आहे. १००८ संत श्री. सितारामदासजी बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही…

Read More

जि. प. बदल्या थेट मंत्रालयात पोहोचल्या:कर्मचारी संघटनेचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना साकडे

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी संघटनेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. जनगणना कामामुळे राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हीच बाब मंत्री…

Read More