Headlines

हलगर्जीपणा:बैठक होत नसल्याने निराधार योजनेचे 542 प्रस्ताव धूळखात, आ. विवेक कोल्हे यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे‎

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा संपूर्ण कारभार सध्या रामभरोसे चालला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील तब्बल ५४२ गरिबांचे नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयात मागील अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या बैठकांचे वेळेवर आयोजन होत नसल्याने गोरगरीब, वयोवृद्ध आणि निराधार…

Read More

14 दिवसांनंतर पारा 45 पार; दिवसभरात 11.2 ने वाढ:संध्याकाळी ढग आले दाटून; वातावरणात झपाट्याने बदल

. जिल्ह्यात हवामानाचा विचित्र खेळ सोमवारी जाणवला. तब्बल १५ दिवसांनी ११ मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४५.२ होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता ३३.९ अंश सेल्सिअस असलेले तापमान संध्याकाळ ५.३० वाजता ४५.१ अंशापर्यंत पोहोचले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ११.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी ६ नंतर मात्र ढग…

Read More

मोजलेला हरभराही परत नेण्याची वेळ:नाफेडच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, पोर्टल बंद पडल्याने अंजनगावात हरभरा खरेदीत गोंधळ‎

हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा (चना) खरेदी प्रक्रियेत अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन नोंदणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर मोजणीसाठी बोलावण्यात तर आले. मात्र अचानक नाफेडचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करत आल्यापावलीच परत जावे लागले. सकाळपासून ट्रॅक्टरभर चना घेऊन…

Read More

कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन‎

“शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते,” असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. अमरावती येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे ग्राम जयंतीनिमित . याप्रसंगी प्रा. राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, महाराजांनी ग्रामगीता ‘ग्रामनाथाला’ म्हणजेच…

Read More

आरोग्य विभागाचे बदली सत्र पूर्ण:91 कर्मचाऱ्यांची वर्णी, अमरावती जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्थानांतर

जिल्हा परिषदेत सुरू झालेले बदली सत्र आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दुपारपूर्वी पूर्णत्वास गेलेल्या या अभियानात आरोग्य विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. आरोग्य विभागातील सन २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेनुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. त्यानुसार आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

अकोला-वाशीम जिल्ह्यातील 835 सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करू‎:जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांची माहिती‎

“सेवा सहकारी सोसायटी हा ग्रामीण सहकार व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायट्या आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले. रविवार, १० मे रोजी सेवा सहकारी सोसायटी, मनब्दा यांच्या नवीन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत…

Read More

करमाळ्यातील सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 25 जोडपी विवाह बंधनात:श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजन, हजारो वऱ्हाडी मंडळीचा सहभाग‎

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाह बंधात अडकली. सनई चौघाड्याच्या गजरात झालेल्या या सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळीने सहभाग घेतला. वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे….

Read More

वावटळीत पत्रे व दगड पडून महिलेचा मृत्यू‎:वैरागमधील संजय नगरात अचानक घडलेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी, उपचार सुरू‎

वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला…

Read More

मित्राच्या कन्येच्या लग्नाला दिली आर्थिक मदत:”अगस्ति”च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; मैत्रीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली‎

शालेय जीवनातील आठवणी केवळ अल्बममध्ये कैद न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा एक वस्तुपाठ अकोले तालुक्यातील ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’ने घालून दिला आहे. आपल्याच एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी या गटाने ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द . अगस्ती विद्यालयातील १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला आहे. नुकतीच…

Read More

संमेलन म्हणजे नाथांची सेवा ही गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात:निफाडमध्ये नवनाथांच्या जयघोषाने दोन दिवसीय भक्तीच्या महाकुंभाची सांगता‎

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व निफाड येथील केंद्राच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय संमेलनात अवघे निफाड ‘नाथमय’ झाले होते. “हे संमेलन म्हणजे नाथांच्या सेवेची सांगता नसून, गावोगावी ही सेवा पोहोचवण्याची ही तर फक्त सुरुवात आहे . वैनतेय विद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नाथभक्त, दत्तभक्त आणि…

Read More