विचार बदला, तरच वर्तन बदलेल- आदर्शऋषीजी महाराज:700 चिमुकल्यांनी गिरवले संस्कारांचे धडे, धर्म आणि विज्ञानाची अनोखी सांगड
मुलांनी केवळ ज्ञानी होण्यापेक्षा, प्राप्त केलेले ज्ञान आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे विचार बदलतात, तेव्हा तुमचे वर्तन आपोआप सकारात्मक होते, असे प्रतिपादन पूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांनी केले. श्री तिलोक रत्न धार्मिक परीक्षा बोर्डाच्या वतीने आयोजित ‘आनंद बालसंस्कार शिबिरा’च्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. १ ते ६ मे दरम्यान रंगलेल्या या शिबिरात नगरसह…