Headlines

‘नंदनवन’ सरासरीपासून गेले दूर; 9 तालुक्यांना पावसाचा फटका:ज्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची हमी, तो चिखलदरा शेवटून तिसरा‎

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर . १४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या…

Read More

वेळकाढू कारभाराविरोधात महावितरण कार्यालयाला घेराव:नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी

तिवसा शहर व तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांच्या नेतृत्वात बुधवारी १ जुलैला महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता व शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घालत त्यांच्याच दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेत महावितरण प्रशासनाविरोधात…

Read More

पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा झाला गौरव:राज्य, जिल्हा, तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान‎

बार्शी तालुका कृषी विभाग व बार्शी पंचायत समिती कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुलै रोजी बार्शी पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कृषी दिन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती बार्शीचे उपसभापती संतोष निंबाळकर, खडकलगावचे माजी सरपंच दीपक रोंगे, बार्शी बाजार समितीचे माजी संचालक वालचंद मुंडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, माजी…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:कारवाईच्या भीतीने क्लिनिकला टाळे ठोकून कौठ्याचा बोगस डॉक्टर पसार

श्रीगोंदे तालुक्यातील कौठा परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बीएएमएसची बनावट पदवी लावून राजरोसपणे नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस बंगाली डॉ. सौरभ अधिकारी याने अखेर आपले “श्रीसान क्लिनिक’ बंद करून पळ काढला आहे. या अवैध कारभाराबाबत “दिव्य मराठी’मध्ये बुधवारी “सलाइन खुंटीला आयुष्य टांगणीला’ हे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने याची दखल घेतली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे आणि…

Read More

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश दिला. पंधरवड्यानंतर पावसाने हजेरी लावल्याचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. यावेळी संस्थापक वनश्री डॉ. जे. डी. पवार आणि प्राचार्य बी. एन….

Read More

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट:पिंपळदरी परिसरात पावसाअभावी खरीप धोक्यात, मृग नक्षत्र कोरडे, आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले‎

जून महिना संपून जुलै उजाडला, तरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले आहे, मात्र अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात, पण पावसाच्या एकाही सरीविना ते परत जात असल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा-पुन्हा मावळत…

Read More

शेती, आरोग्य ही देशाच्या प्रगतीची दोन मजबूत चाके- डॉ.व्हलेरियन फर्नांडिस:पैठण येथे रोटरी क्लबतर्फे प्रगतिशील शेतकरी, डाॅक्टरांचा गौरव‎

कृषी दिन आणि डॉक्टर्स डेचे औचित्य साधून रोटरी क्लब पैठणच्या वतीने बुधवारी पैठण औद्योगिक वसाहतीतील सेंट पॉल्स मिलन हॉल येथे प्रगतिशील शेतकरी आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे ट्रेनर तथा सेंट पॉल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक रो. डॉ. व्हलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते नानेगाव येथील युवा शेतकरी बाळासाहेब माने, मुधलवाडी येथील…

Read More

दिलासा:संभाजीनगरला आज-उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट, 16 दिवसांनी राज्यात मान्सून परतला, पेरण्या मार्गी लागू शकतात

एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून कोकणातील हर्णे व सोलापूरजवळ अडकला होता. 15 जूनपर्यंत राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर 16 दिवसांनी मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या 25 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 7…

Read More

भाजपचे मिशन 360:आता राष्ट्रवादी, सपा, द्रमुकला खिंडार पाडण्याची तयारी, मोठ्या घटनात्मक बदलांसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक

भाजपचे रणनीतीकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन 360’ मध्ये गुंतलेत. 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण व परिसीमनाशी संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतर भाजपने संसदेत दोन तृतीयांश बहुमताची रणनीती वेगवान केली होती. पक्षाचे लक्ष केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नसून ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायालयीन सुधारणांसारख्या मोठ्या घटनात्मक बदलांसाठी आवश्यक ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे. यासाठी विरोधी पक्षांत फूट,…

Read More

160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या तपासात २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने नाशिकमध्ये बुधवारी तब्बल ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात शिक्षण विभागातील बडे अधिकारी आणि भ्रष्ट संस्थाचालकांवर कारवाईची टांगती…

Read More