Headlines

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात बोमा तंत्रज्ञानाने 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर:वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात (TATR) भक्ष्यांची घनता संतुलित करण्यासाठी वनविभागाने ‘बोमा तंत्रज्ञाना’चा वापर करत ३० चितळांचे यशस्वी स्थलांतर केले आहे. प्रकल्पाच्या ‘सक्रिय पर्यावरणीय व्यवस्थापन’ धोरणांतर्गत, अधिक भक्ष्यांची संख्या असलेल्या भागातून कमी संख्या असलेल्या भागात तृणभक्षक प्राण्यांना हलवण्यात आले आहे. यामुळे वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, गाभा क्षेत्रातील…

Read More

फुलेवाड्यातील पूजेवरून वाद:खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा, शरद पवार गटाची मागणी; पुरातत्व विभागाला पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महात्मा फुले यांच्या वाड्यात विनापरवानगी वटपौर्णिमा साजरी केल्याप्रकरणी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच, शनिवारवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती तसेच संविधान दिन यांसारखे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची…

Read More

पुण्यातील वारसा स्थळांसाठी स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करा:आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी, एकात्मिक आराखड्याची शिफारस

आमदार हेमंत रासने यांनी पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा स्थळांच्या जागतिक दर्जाच्या विकासासाठी स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्याची मागणी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. त्यांनी या स्थळांसाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याची शिफारस केली. रासने यांनी कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवार वाडा, लाल महाल, भिडे वाडा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग,…

Read More

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा:जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसविण्याचा…

Read More

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने…

Read More

बीड भूसंपादन घोटाळा:बदलीनंतरही काढले बॅकडेटचे आदेश; 241 कोटींच्या गैरव्यवहारातील अतिरिक्त रक्कम वसूल होणार

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52च्या भूसंपादन प्रकरणातील तब्बल 241 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यावर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी (लवाद) यांनी बदली झाल्यानंतरही मागील तारखांनी आदेश काढून भूसंपादनाची रक्कम वाढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वितरित झालेली अतिरिक्त…

Read More

सीईओ पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी:आषाढीवारीच्या तयारीचा घेतला आढावा, समन्वयाने काम करण्याच्या सूचना

आषाढीवारीच्या तयारीच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व संबंधित विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक…

Read More

मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, पालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त…

Read More

9 जुलै रोजी राज्यात शाळा बंद आंदोलन:प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक, मुंबईत धरणे

9 जुलै रोजी राज्यातील शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. शिक्षक अभियोग्यता परीक्षेतील (टीईटी) जाचक अटी, रखडलेल्या पदोन्नत्या, विद्यार्थीविरोधी संचमान्यता धोरण आणि बीएलओच्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त ताण यांकडे राज्य शासनाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी शिक्षकांच्या सामूहिक रजेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात…

Read More

जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेतील गैरकारभाराचा अहवाल सादर करा:डीडीआर सुरेखा फुपाटे यांचे आदेश, एक सदस्यीय समिती स्थापन

हिंगोली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गैरकारभाराची चौकशी करून सहा महिन्यात अहवाल सादर करण्याच आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिले आहेत. त्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला होता. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक फुफाटे यांनी सुनावणी घेतली होती. या सुनावणी नंतर पतसंस्थेचे संचालक…

Read More