Headlines

दिव्य मराठी ब्रेकिग:महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा प्रस्ताव, वावीजवळ 100 एकरवर उभारणार जिल्ह्यातील पहिला एमएसएमई पार्क

100 दिवसांच्या कृती आराखड्याचा पाठपुरावा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 100 एकर जागेवर एमएसएमई पार्क उभारण्याचे धोरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात नमूद केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील वावीजवळ एमआयडीसीकडून 100 एकर जागेचा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी….

Read More

सोयाबीनच्या दरामध्ये उसळी; भाव 7 हजार पार:5 वर्षांतील सर्वाधिक दर, शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले, दरवाढीचा साठेबाजांनाच जास्त फायदा‎

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनला सर्वाधिक ७१४५ रुपये दर मिळाला असून गत पाच वर्षात सोयाबीनच्या पिकास मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचे बोलले जाते. मात्र, या दरवाढीचा फायदा कोणत्याही शेतकऱ्यांना होणार नसून साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडे माल असताना भाव नाही आता भाव मिळाला तर धान्याचे कोठार…

Read More

कविता जीवनाच्या विविध छटांना शब्दरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न:प्रा. डॉ. नाना भडके यांचे प्रतिपादन; संगीत, साहित्यांची जुगलबंदी‎

मन हे नेहमी शब्दांपूर्वी जन्मते आणि कविता ही त्याची सावली असते. कधी दीर्घ, कधी अल्प, पण नेहमीच अंतःकरणाशी निगडित असते. जीवनाच्या विविध छटांना शब्दांच्या रूपात व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कविता, तसेच संगीत आणि कविता यांचा संगम म्हणजे भावनांचा एक निराळाच प्रवाह असतो. जो मनाला शुद्ध करतो, स्थिर करतो, असे विचार प्रा. डॉ. नाना…

Read More

रस्ता चुकलेल्या वृद्धेला अवघ्या तीन तासांत पोहोचवले घरी:कुटुंबीय झाले हतबल; एक कॉल आला अन् शोधकार्याला झाली सुरूवात‎

महापालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या चमूने वाट विसरलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांच्या शोध मोहीमेनंतर सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांची धडपड आणि त्यांच्या परिश्रमाचे यानिमित्ताने कौतुक केले जात आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या त्या रहिवासी आहेत. काही कामानिमित्त सकाळी ९…

Read More

ससेवाडी येथील जंगलात साडेपाच हजार लिटरचा जीवनदायी पाणवठा:तहानलेल्या वनचरांना जाणीव फाउंडेशनचा मायेचा ओलावा‎

यंदाच्या उन्हाळ्याने सर्वच मर्यादा ओलांडल्या असून, अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या वन्यजीवांसाठी सावेडीच्या जाणीव फाउंडेशनने संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. जेऊर परिसरातील ससेवाडीच्या जंगलात असलेला ५५०० लिटर क्षमतेचा विस्तीर्ण पाणवठा फाऊंडेशनच्या वतीने पूर्ण क्षमतेने भरण्यात आला असून, वनचरांना मोठा दिलासा…

Read More

बचत गटाच्या 64 महिलांना अडीच लाखांचा गंडा:विंचूरच्या दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत गरजू, कष्टकरी महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन देण्याचे आमिष

. विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण व सरकारच्या विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशिन व १५ हजार रुपये रोख मिळवून देण्याचे काम करतो. संस्थेमार्फत महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार आहोत, असे आमिष दाखवून महिलांकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय:सरकारी भरती आरक्षण नियमात बदल; लाभार्थ्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाही, ओबीसी महासंघाचा विरोध, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांपासून ते जलसंधारणापर्यंत अनेक धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावण्यात आला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. त्यांची गणना…

Read More

महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक!:मुंबईत साकारणार देशातील मोठे 'एआय कॉम्प्युट हब', 2 हजार कामगारांना रोजगार

महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री समिती कक्षात संपन्न झालेल्या या सामंजस्य करार सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह…

Read More

एका कॉलमुळे हरवलेल्या वृद्धेचा तीन तासांत शोध:अमरावती मनपाच्या आधार केंद्राची कौतुकास्पद कामगिरी

अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या पथकाने हरवलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांत शोधून तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. या कामगिरीमुळे आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्या बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या रहिवासी आहेत. सकाळी ९ वाजता त्या काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या…

Read More

परिचारिका काळी फित बांधून काम करणार:दोषींवर कारवाई न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) परिचारिकांनी एका सहकाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन पुकारले आहे. दोषींवर कारवाई न झाल्याने आज, १५ मे रोजी परिचारिका काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास १६ मे पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ६ मे रोजी एका परिचारिकेवर अन्याय झाल्याची घटना घडली होती….

Read More