Headlines

औषध विक्रेत्यांच्या संपावर प्रशासनाची पर्यायी व्यवस्था:20 मे रोजीच्या देशव्यापी बंदमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनाने औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. नागरिकांना आवश्यक औषधे अखंडपणे उपलब्ध व्हावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सज्ज झाले आहे. विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार, २० मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंदची…

Read More

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे!:पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरू, ताफ्यात 10 नवीन EV दाखल

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरुवारी (14 मे) नवीन…

Read More

आळंदीत घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार:नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

घरात घुसून जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली. याप्रकरणी नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी घुसखोर महाराज यांची…

Read More

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

मोदींचा काटकसरीचा सल्ला अन् साताऱ्यात उधळपट्टी!:टीकेची झोड उठताच सरकारचा 'यू-टर्न'; 400 एसटी बसेसचे नियोजन रद्द

साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांची संख्या कमी केली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा सर्व पदांचा राजीनामा:सुनेत्रा पवारांकडे सोपवले पत्र, मोजक्या शब्दांत भावना व्यक्त; शिवसेनेत जाण्याची चर्चा

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेण्यास सुरुवात केली असली, तरी पक्षात सध्या अंतर्गत राजकारणाला वेग आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. अशातच आता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे…

Read More

खासदार प्रणिती शिंदेंची मंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस:7 दिवसांत बिनशर्त माफी मागा! अब्रूनुकसानीचा दावा ठोकला

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून, रस्तेकामाच्या श्रेयवादावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदे यांनी गोरेंना नोटीस बजावली आहे. सातारा जिल्ह्याचे असूनही सोलापूरच्या राजकारणात आपला प्रभाव पाडणाऱ्या जयकुमार गोरेंच्या आक्रमक शैलीची आणि भाषणांची नेहमीच चर्चा होत असते, मात्र यावेळी त्यांच्या एका विधानावर आक्षेप घेत प्रणिती…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पहिलाच धक्का:राष्ट्रवादीत मोठ्या नेत्याकडून राजीनामा बॉम्ब; विधान परिषद डावलल्याची नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आनंद परांजपे हे पक्षात सरचिटणीस, प्रवक्ते तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून यासंदर्भातील…

Read More

निवडणुका संपल्यावरच सरकारला गांभीर्य का सुचले?:सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही यावे- शरद पवार; मुख्यमंत्र्यांचेही टोचले कान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच केंद्र सरकारवर त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरून फटकारले आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या भाषेचाही निषेध केला आहे. शरद पवार म्हणाले, परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची…

Read More