Headlines

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 ठार:चंद्रपूरहून अमरावतीकडे येताना धामणगाव रेल्वेजवळ घटना

समृद्धी महामार्गावर रविवारी (28) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात भास्कर महादेव जीवने (65), महादेव जिवाजी जीवने (43), लताबाई महादेव जीवने (60), आरती भास्कर जीवने (41) आणि जिज्ञा भास्कर जीवने (12)…

Read More

न्यू एरा रुग्णालयात 20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त:एफडीएची कारवाई; प्रिस्क्रिप्शन थेट मेडिकल स्टोअरला पाठवत होते

उपराजधानीतील प्रसिद्ध ‘न्यू एरा’ रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला तब्बल 20 लाख 15 हजार 290 रुपयांचा औषधसाठा पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या नागपूर पथकाला ‘न्यू एरा’ हॉस्पिटलच्या फार्मसीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती….

Read More

बीएलओच्या संपर्कासाठी हिंगोली उपविभागात कम्युनिकेशन प्लॅन:एका क्लिकवर होणार संपर्क; एसडीएम समाधान घुटुकडे यांचा पुढाकार

हिंगोली उपविभागामध्ये निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मतदार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून बीएलओच्या संपर्कासाठी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पुढाकारातून क्विक कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बीएलओची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहे. या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क होणार आहे. या…

Read More

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच संपवण्याचा भाजपचा डाव?:मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसलेत, त्यांना चिरडल्याशिवाय देश वाचणार नाही- उद्धव ठाकरे

आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नाही, मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. सध्या सुरू असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे वास्तवत: ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असू शकते. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येऊ द्यायचे नसेल; कारण ते जर दिल्लीत गेले तर कोणाची तरी पंतप्रधानपदाची संधी हुकेल. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातच संपवून टाकण्याचा हा…

Read More

मित्रांसोबतची कोकण ट्रीप ठरली अखेरची:स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारणे बेतले जीवावर, डोकं तळाला आदळल्याने तरुणाचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या एका २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ४ फूट खोल असलेल्या पूलमध्ये उंचावरून मारलेली उडी या तरुणाच्या जीवावर बेतली. श्रेणीक मिलिंद टाकळे (वय २५, रा. इसलामपूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत आनंदाने…

Read More

पाबे घाटात मिनी बसचा भीषण अपघात:मिनी बस दरीत कोसळून 2 पर्यटकांचा मृत्यू, राजगडावर चालले होते ट्रेकिंगला

राजगडावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांची मिनी बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस चालकासह अनेक पर्यटक गंभीर जखमी…

Read More

सांगली हादरली:अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक

प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने…

Read More

आपला भारत देश अमली पदार्थमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन‎

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त केल्यानंतर आता अमली पदार्थमुक्त देशासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारही याबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहे. त्यामुळे भाजयुमोने ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या माध्यमातून राज्य नशामुक्त करण्याचा संदेश तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे…

Read More

कोळेगावात अंधार, जि.प. आवारात मुले आले अभ्यासाला:दोन दिवसांपासून 15 तास गावात बत्ती गुल; प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी‎

सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी कोळेगाव नागरिकांसह . आंदोलनाचा दिला इशारा चौकशी करून माहिती देतो Source link

Read More