Headlines

Nashik-Haryana NEET Paper Leak Network Uncovered

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांनी दिले . तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार…

Read More

12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची…

Read More

इंधन बचतीचे पंतप्रधानांचे आवाहन देशाच्या हिताचे; उगाच बाऊ करू नका:निदा खान एक 'पेड वर्कर'; महाराष्ट्रात धर्मांतराचे मोठे रॅकेट- संजय शिरसाट

मंत्र्यांपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनी काटकसर केली पाहिजे. अमेरिका-इराण युद्ध वाढले तर देशात इंधन टंचाई येऊ शकते, त्यामुळे बचत करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, त्यांच्या या सांगण्याचा कोणी बाऊ करू नये, आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा करू नये, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एकट्यासाठी कार वापरण्यापेक्षा मेट्रोने प्रवास करावा. पंतप्रधान…

Read More

₹1768 Crore Fund for 5459 Cops Homes

राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 1768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निर्णयाचा लाभ 5459 पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य . देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलिसांना स्वतःचे…

Read More

इंदिरा गांधींनी सोने खरेदी टाळायला सांगितली तेव्हा अस्वस्थता नव्हती का?:शेतकरी आत्महत्या होत होत्या तेव्हा अस्वस्थता नव्हती का? भाजपचा पवारांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर शरद पवार म्हणातत की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते त्यावेळी कोणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.जेव्हा तुम्ही कृषीमंत्री असताना महाराष्ट्रात शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळी तुम्हाला अस्वस्थता जाणवली नाही का? त्यावेळी तुम्ही काही पावलं टाकली होती…

Read More

आसाममध्ये शपथविधीपूर्वी कामाख्या मंदिरात नेत्यांची गर्दी:सुनेत्रा पवार म्हणाल्या- नवचैतन्य मिळालं, सर्वांच्या समृद्धी, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना

आसाममध्ये भाजप सरकारच्या नव्या शपथविधी सोहळ्यापूर्वी कामाख्या देवी मंदिरात देशभरातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नीलांचल पर्वतावर वसलेल्या प्रसिद्ध शक्तीपीठात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदिशक्ती माता कामाख्या देवीचे दर्शन घेत सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना केली. या नंतर त्यांनी सामाजिक माध्यमांवर आपला आध्यात्मिक अनुभव व्यक्त करत मंदिर दर्शनातून सकारात्मक ऊर्जा आणि…

Read More

इग्नीसिया-2026' हॅकेथॉनमध्ये मुंबईच्या 'ब्रॉन जीपी' संघाचा डंका:एमआयटी डब्ल्यूपीयू उपविजेते, मणिपाल युनिव्हर्सिटीला द्वितीय उपविजेतेपद

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे नुकतीच ‘इग्नीसिया-2026’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा संपन्न झाली. वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या आव्हानावर आधारित या स्पर्धेत मुंबईच्या ब्रॉन जीपी टीमने विजेतेपद पटकावले. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या बिआँड बिट्स संघाने उपविजेतेपद मिळवले, तर कर्नाटकच्या मणिपाल युनिव्हर्सिटीच्या ट्रायस्टॅक ओव्हरफ्लो संघाने द्वितीय उपविजेतेपद पटकावले. ‘विचार करा, निर्मिती…

Read More

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?:पेट्रोल दरवाढीची ही पूर्वतयारी तर नाही ना? राज ठाकरेंनी पत्रातून पंतप्रधानांना दाखवला आरसा

देशातील वाढती महागाई, इराण-इस्रायल युद्धामुळे वाढलेले कच्च्या तेलाचे भाव आणि ढासळती अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना खरमरीत पत्र लिहित आरसा दाखवला आहे. “चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?” असा जळजळीत सवाल करत राज ठाकरेंनी या पत्राद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर…

Read More

हळदीच्या शेतातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा 10 किमी अंतरावर सापडला मृतदेह:गुरुवारी होणार होता विवाह, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील भावी नवरदेवाचा मृतदेह 10 किलो मिटर अंतरावर असलेल्या आडगाव शिवारातील एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वायचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतदेहावर सोमवारी ता. 11 रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी…

Read More

हलगर्जीपणा:बैठक होत नसल्याने निराधार योजनेचे 542 प्रस्ताव धूळखात, आ. विवेक कोल्हे यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे‎

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा संपूर्ण कारभार सध्या रामभरोसे चालला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील तब्बल ५४२ गरिबांचे नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयात मागील अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या बैठकांचे वेळेवर आयोजन होत नसल्याने गोरगरीब, वयोवृद्ध आणि निराधार…

Read More