Headlines

लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी सटाण्यात उपोषण मागे, साक्री-शिर्डी महामार्गाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन‎

शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. साक्री-शिर्डी महामार्गावरील सुकड नाला ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण…

Read More

कन्नड शहरावर पाणीटंचाईचे सावट; अंबाडी प्रकल्पात 16 टक्केच साठा:6453 नळजोडण्यांचे सर्वेक्षण, अनधिकृत नळांवर होणार कारवाई‎

शहराची तहान भागविणाऱ्या अंधानेर येथील अंबाडी मध्यम प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ग्रॅव्हिटीने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा करणे केवळ महिनाभरच शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिष . कन्नडची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली आहे. पिशोर नाका, चंद्रलोकनगरी, नर्सिंगपूर, शरद पवार कॉलनी आणि म्हाडा यांसारख्या नवीन वसाहतींच्या हद्दवाढीमुळे पाणीपुरवठ्यावर…

Read More

ओळख लपवण्यासाठी फरार आरोपी बनला भिकारी:पंढरपूर येथून अटक, सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये दाखल होता मनुष्यवध, विनयभंगाचा गुन्हा‎

मनुष्यवध, विनयभंगासारख्या गुन्ह्यात एका महिन्यापासून फरार असलेला सिल्लोड तालुक्यातील भवन येथील आरोपी पंढरपूर येथे लपून बसला होता. ओळख लपवण्यासाठी तो भिकारी बनला. मात्र, सिल्लोड पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील मंदिरासमोरून भिकाऱ्याच्या वेशात असताना अटक केली. अनिल मनोहर मोहिते, (रा. भवन ता. सिल्लोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी भवन…

Read More

लैंगिक अत्याचारातील चिमुकलीवर टणक हत्याराच्या जखमा आढळल्या:नसरापूर प्रकरणातील नराधमाच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ

नसरापूर येथे १ मे रोजी लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. ६५ वर्षीय नराधमाने टणक हत्याराने या जखमा केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. मात्र, भीमराव कांबळे या नराधमाची चौकशी केली असता तो त्या हत्याराबाबत समाधानकारक उत्तरे देत नाही, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात नराधमाच्या हातामध्ये शेवेचा पुडा…

Read More

भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले:स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या…

Read More

सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट:सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये चर्चा; तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो- तटकरे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याचे सांगितले जात असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण…

Read More

अमरावती तालुक्यात पाणंद रस्त्यांची मोजणी सुरू:शेतकऱ्यांच्या वाहतूक समस्येवर तोडगा

अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागात वर्षानुवर्षे रखडलेल्या पाणंद रस्त्यांच्या समस्येवर आता महसूल विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या महसूल अभियानादरम्यान या संदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार, एसडीओ अनिल भटकर आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी वेळापत्रक तयार…

Read More

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद:पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा, कौटुंबिक सहलीचे होते नियोजन

देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणमंत्री, शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी…

Read More

चोपड्यातील पंकज नगर भागात दीड महिन्यांपासून विजेचा लपंडाव:संतप्त नागरिकांनी अभियंत्यांना धरले धारेवर, बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा

चोपडा शहरातील पंकजनगर आणि परिसरातील नागरिक गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विजेच्या भीषण समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. ४५ अंशांच्या घरात पोहोचलेल्या तापमानात वारंवार वीज गुल होत असल्याने आणि विजेच्या दाबात (व्होल्टेज) कमालीची अनियमितता असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज संतप्त नागरिकांनी पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील…

Read More