Headlines

भाडेवाढ करूनही एसटी महामंडळाचे 21 विभाग तोट्यात:अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम; उत्पन्न न वाढल्यास थेट निलंबनाचा इशारा

एसटी महामंडळाच्या सातत्याने ढासळत चाललेल्या आर्थिक स्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता निष्काळजी आणि सुस्त अधिकाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाच्या कामचुकार अधिकाऱ्यांना सरळ शब्दांत ताकीद देत केवळ एक महिन्याची मुदत (अल्टिमेटम) दिली आहे. येत्या महिनाभरात एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस परिणाम न दिसल्यास, संबंधित अधिकाऱ्यांची थेट बदली, पदावनती…

Read More

नदीष्टचा अभ्यास:मनोज बोरगावकर यांची 'नदीष्ट' एम. ए. हिंदीला; नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकवणार

मराठवाड्यातल्या नांदेडचे सुप्रसिद्ध लेखक आणि कवी मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलाय. मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीच्या आत्तापर्यंत 21 हून अधिक आवृत्त्या निघाल्यात. विशेष म्हणजे या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचा तब्बल 5 लाख रुपयांच्या राष्ट्रभाषा सन्मानाने गौरव झालाय. नदीष्ट कादंबरीचे हिंदी, गुजराती, कन्नड आदी…

Read More

‘एक गाव, एक वडाचे झाड’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद:छावा प्रतिष्ठानच्या वतीने‎महिलांचा विशेष सन्मान‎

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘एक गाव, एक वडाचे झाड’ या अभिनव उपक्रमाला शेळगाव (आर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी गावातील सदस्यांना वडाची रोपे वाटप करण्यात आली होती. केवळ वृक्षारोपण न करता त्या रोपांचे संगोपन करण्यावर भर देण्यात आला होता. याला सकारात्मक प्रतिसाद…

Read More

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी

लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. . दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या दीड तासाच्या पावसामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यालय आणि सर्व शिक्षा अभियान कार्यालयाच्या आवारात गुडघाभर…

Read More

शिवाजीराव शिंदे यांच्या शोकसभेत आठवणींना उजाळा:तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला अखेरचा निरोप; सभेत 40 पेक्षा जास्त मान्यवरांकडून भावना प्रकट‎

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांचे २१ जून २०२६ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त करत लातूरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरमधील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आयोजित या शोकसभेला नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी…

Read More

उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, 'खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच' असल्याचा पुनरुच्चार

“उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप विचारांसाठी,…

Read More

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी जागेची पाहणी:डिसेंबरमध्ये विकासकामासाठी होणार निधीची तरतूद‎

देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात अत्यंत भरीव काम केले. त्यामुळे त्यांच्या नावाने अमरावतीत शैक्षणिक संकुल उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या संकुलासाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज, रविवारी येथे केली. पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणेला सूचना देताना त्यांनी या संकुलासाठीचा…

Read More

There will be a break in the rains after the 10th in July, with cyclonic winds blowing, there will be satisfactory rain everywhere in the first week.

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वद . यंदा अल निनो च्या प्रभावामुळे अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात कमी…

Read More

पांदण रस्त्यांची कामे सुरू करा:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा, शेतकरी, महिला व पदाधिकाऱ्यांचा सहभाग

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पांदन रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत, या प्रमुख मागणीसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्थानिक बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे उपाध्यक्ष प्रा. शरद पुसदकर आणि तालुका अध्यक्ष दिनेश धवस यांनी केले. महिला आघाडी प्रमुख…

Read More

आषाढी वारीत आशा स्वयंसेविकांमार्फत आरोग्य जनजागृती:आरोग्य विभागाच्या सूचना, निरोगी वारी सुरक्षित वारीचा संदेश

आषाढी वारी-२०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांमार्फत व्यापक आरोग्य जनजागृती राबविण्याचे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी दिले आहेत. पंढरपूर आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा असून, या काळात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. गर्दी, प्रवास, बदलते हवामान तसेच संसर्गजन्य…

Read More