Headlines

अहिल्यानगर शहरामध्ये घुमला ‘लतादीदीं’च्या सुरावलींचा जागर:राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या उपक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीताची सरस्वती’ या विशेष व्याख्यानासह तेलुगू सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीत वारशाचा जागर करण्यात आला. व्याख्यानातून त्यांच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलू उलगडले गेले तर विविध पारंपरिक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना भारतीय पारंपारिक…

Read More

मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स-रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई:थेट परवानेच केले निलंबित, बनावट FDA अधिकाऱ्यांचाही पर्दाफाश

राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका प्रसिद्ध…

Read More

छत्रपती संभाजीनगर मनपात अधिकारी-ठेकेदारांची भ्रष्ट साखळी:भाजपचे माजी आमदार केणेकरांकडून भ्रष्टाचाराचे आरोप

मनपात सत्ता मिळवणाऱ्या भाजपला आता पक्षातील माजी आमदारांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आश्वासनाला हरताळ फासला जात असून मनपात अधिकारी, ठेकेदार आणि पीएमसीची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी सोमवारी (29 जून) केला. मनपा आयुक्त कुणाच्या तरी दबावाखाली काम करत…

Read More

घंटागाडी खरेदी, बोअरवेल दुरुस्तीला मंजुरी:आपत्तीसाठी नोडल अधिकारी, नगरसेवक पतीच्या सभागृहातील प्रवेशाने सभापती संतप्त‎

मनपाच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र, ही सभा प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची मनमानी, बाजार फी वसुलीतील उदासीनता व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यांवरून वादळी ठरली. सदस्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा संकलनासाठी नव्या…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी‎

सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…

Read More

आंबे गावात विजेच्या धक्क्यातून पतीला वाचवताना पत्नीचाही अंत:वटपौर्णिमेदिवशीच घाला, माेटार सुरू करण्यासाठी गेला होता शेतकरी‎

प्रतिनिधी | आंबे सात जन्माच्या सोबतीचे व्रत असणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशीच आंबे गावात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना सोमवारी घडली. सकाळच्या सुमारास शेती पंपाची मोटर बंद करताना विजेचा धक्का लागलेल्या पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत मोटारीला चिकटलेल्या पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीलाही विजेने कचाट्यात घेतल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या सणादिवशी सकाळच्या प्रहरी ६.३०…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:दिल्लीगेट रस्त्यावर दुभाजकाला महापालिकेने बसवले रिफ्लेक्टर, उपमहापौरांच्या आदेशानंतर उपाययोजना‎

दिल्लीगेट रस्त्यावरील नव्याने उभारलेल्या दुभाजकामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने चारचाकी व दुचाकी वाहने त्यावर आदळत आहेत. याबाबत दिव्य मराठीने लक्ष वेधल्यानंतर उपमहापौर धनंजय जाधव यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली. त्यानंतर महापालिकेने सोमवारी दुभाजकाच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवले आहेत….

Read More

फुलंब्री, सोयगाव तालुक्यात पेरण्यांना वेग:कापूस, सोयाबीन लागवडीकडे कल, काही ठिकाणी मुसळधार, तर कुठे समाधानकारक पाऊस‎

जून महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या फुलंब्री आणि सोयगाव तालुक् यांतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. दोन्ही तालुक्यांत झालेल्या समाधा नकारक पावसामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या आणि लागवडीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली असून बळीराजा सुखावला आहे. सोयगाव तालुक्यात लागवडीच्या हंगामात मजुरांची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकऱ्यांना वाढीव मजुरी देऊन कामे…

Read More

जायकवाडीत लवकरच मत्स्यबीज सोडले जाणार:40 वर्षांपासून शासनाकडून मत्स्यबीज न सोडल्याचा मुद्दा आला ऐरणीवर‎

पैठण जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा संवर्धन, नियमित मत्स्यबीज संचयन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या शाश्वत उपजीविकेसाठी मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार विलास भुमरे, जायकवाडी मच्छीमार संघटनेचे नेते तथा नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्यासह संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. बैठकीत जायकवाडी जलाशयात नियमितपणे मत्स्यबीज सोडण्यासाठी…

Read More