Headlines

विठ्ठल भक्तांसाठी 18 महिन्यांत दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणार:624 मीटर लांबीच्या कामाला 103 कोटी 79 लाखांच्या निधीतून गती

. पंढरपुरात येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांसुलभ, सुखकर दर्शनासाठी, दर्शन रांग सुटसुटीत, सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन दर्शन मंडपाचे काम सुरु करण्यात आलेले असून येत्या १८ महिन्यात भव्य दर्शन मंडप, स्काय वॉक बांधून पूर्ण होईल अशा गतीने काम सुरु करण्यात आलेले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची ऊन, वारा, पाऊस, थंडी पासून सुटका करण्यासाठी आणि विठ्ठल दर्शन…

Read More

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎

पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या यात मेळाव्यात कौटुंबिक समस्या न . मेळाव्यात अध्यक्षस्थानी उमरीचे माजी सरपंच तथा ओम साई बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम कपले होते. प्रमुख…

Read More

लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती‎

२५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. ज्यावेळी सत्तेसाठी देशातील जनतेच्या स्वातंत्र्याला बेड्या घातल्या गेल्या, तो भीषण कालखंड देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी वरूड – मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्तच्या विशेष स्मरण कार्यक्रमात ते बोलत…

Read More

चांदूर बाजारमधील रस्ता पूर्ण उखडला:विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय, लोखंडी सळ्या निघाल्या‎

शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५, प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अक्षरशः उखडलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. चांदूर बाजार-वलगाव मार्गावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जाणारा…

Read More

पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन‎

सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत…

Read More

प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक‎:कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे प्रतिपादन, आरोग्य शिबिराला प्रतिसाद

हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. युवापिढीतही अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजेत. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी…

Read More

सहभागातून साकारला दीड किमी रस्ता‎:विंचुरे, वटार आणि डोंगरेजच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून साधला विकास‎

सटाणा बागलाण तालुक्यातील विंचुरे, वटार आणि डोंगरेज या तीन गावांतील शेतकऱ्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर दुर्गम भागात तब्बल दीड किलोमीटर लांबीचा व २० फूट रुंदीचा रस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होणारा त्रास या उपक्रमामुळे दूर झाला असून, तिन्ही गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या…

Read More

घाटनांद्र्यात नदी खोलीकरण पूर्णत्वाकडे:शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार, शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार फायदा

घाटनांद्रा चारणेरवाडी शिवारातील जुना नदीच्या खोलीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या उपक्रमामुळे परिसरातील शेकडो एकर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. चारणेरवाडी परिसरातील शेतजमिनी प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाणी वेगाने वाहून जात…

Read More

अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना:सिल्लोड आगाराच्या वतीने 1574 विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप

ग्रामीण भागातील मुलींना शिक्ष ासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राज्य परिवहन महामंड ळाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेला सिल्लोड आगारात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पासेस मिळण्याबाबत काही अडचण आल्यास विद्यार थिनींनी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आगारप्रमुख सतीश अंभोरे यांनी केले आहे. सिल्लोड बसस्था कावरून १२२४ व अजिंठा बसस्था कावरून ३५० पासेसचे वाटप करण्यात आले…

Read More

राज्यभरात सहा दिवस पावसाचा यलो अलर्ट:मध्य महाराष्ट्र, कोकणात जोर अधिक

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल,असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुण्यासह…

Read More