पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या महिला, इगतपुरीतील गिरणारेत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप
पावसाळा सुरू असतानाही इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तेही अवघ्या ३० मिनिटांसाठी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने…