Headlines

पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या महिला‎, इगतपुरीतील गिरणारेत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप‎

पावसाळा सुरू असतानाही इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवड्यातून केवळ तीन दिवस आणि तेही अवघ्या ३० मिनिटांसाठी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावात पाणीपुरवठ्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने…

Read More

शाळांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता उपक्रमशील व्हावे:अंधानेरच्या ‘ड्रेन फॉरेस्ट’चे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक‎

जिल्हा परिषद शाळांनी केवळ पाठ्यपुस्तकीय शिक्षणापुरते मर्यादित राहू नये, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शाळा आणि ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमांमुळेच गावाचा कायापालट होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी येथे केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आलेल्या ड्रेन फॉरेस्ट या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मतदार पुनरनिरीक्षण कामाची प्रत्यक्ष…

Read More

लाडसावंगीत हुतात्मा काशीनाथ म्हस्के‎स्मारकाची दुरवस्था:प्रशासनाचे दुर्लक्ष‎, छताचे फॉल्स सीलिंग, लोखंडी चॅनल्स तुटले, परिसराचे विद्रुपीकरण

Marathi News Local Maharashtra Aurangabad The Poor Condition Of The Memorial Of Martyr Kashinath Mhaske In Ladsawangit; Neglect By The Administration, False Ceiling Of The Roof, Broken Iron Channels, Disfigurement Of The Area लाडसावंगी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लाडसावंगी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सरकारकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र,…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:84 तासांची बचावमोहीम अखेर पूर्ण; 9 जणांचा मृत्यू, पर्यावरण विभागाला नोटीस बजावण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोध आणि बचावकार्य सलग ८४ तासांनंतर पूर्ण झाले आहे. या घटनेत एकूण ९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मृतांच्या . मनाला सुन्न करणारी घटना या हृदयद्रावक घटनेवर पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी…

Read More

प्रगतिशील शेतकरी:झिगझॅग लागवडीतून अवघ्या 1 एकरात डाळिंबातून 42 लाख उत्पन्न, सांगोला तालुक्यातील अजनाळेच्या शेतकऱ्याचा प्रयोग

द्राक्षबागेतील मोठ्या नुकसानीनंतर खचून न जाता सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील प्रयोगशील शेतकरी साधू किसन कोळवले यांनी डाळिंब लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. क्रॉस (झिगझॅग) पद्धतीने अवघ्या एका एकरात १,००० झाडांची लागवड करत त्यांनी १८.५ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेतले. बाजारात प्रति किलो २०० ते २११ रुपये दर मिळाल्याने त्यांना सुमारे ४२ लाखांचे उत्पन्न मिळाले. कमी क्षेत्रातून…

Read More

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७…

Read More

निरंजन संस्थेने घेतले 3 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व:बीड, अहिल्यानगर, पुण्यातील विद्यार्थ्यांना क्लिन सायन्सचे सहकार्य

पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दुष्काळग्रस्त बीड, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाची संधी मिळणार आहे. क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम राबवला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी ही माहिती दिली. या उपक्रमांतर्गत पुणे आणि परिसरातील २९…

Read More

शुभांगी देशपांडे, अनुराधा काळे यांना आगरकर, दाभोलकर पुरस्कार:महाराष्ट्र अंधश्रद्धेत चाचपडतोय, प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शुभांगी देशपांडे यांना आगरकर स्मृती पुरस्काराने, तर अनुराधा काळे यांना डॉ. दाभोलकर कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी चिंता व्यक्त केली की, आगरकर-दाभोलकरांचा महाराष्ट्र सध्या अंधारात चाचपडत आहे. प्रा. जोशी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात बुवाबाजी वाढली असून बुद्धीप्रामाण्यवादाची उपेक्षा होत…

Read More

पालखी सोहळ्यात भाविकांचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास:पुणे, मांजरी, हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही पुणे-सोलापूर रस्ता, भवानी पेठ आणि हडपसर परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी समर्थ, मांजरी आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री…

Read More

Congress Demands PM Modi Break Silence on Ram Mandir Donation Scam; Probe by Supreme Court

अयोध्या येथील श्रीराम मंदिर कथित देणगी घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे आणि दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केंद्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट पंखुडी पाठक यांनी रविवारी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्य . पंखुडी पाठक यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण करून भाजपने केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली. मात्र, संपूर्ण देशाच्या…

Read More